शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावांना आमदार फंडातून निधी

By admin | Updated: April 24, 2015 00:36 IST

कळंब : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गावांगावात जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. या कामासाठी कळंब तालुक्यातील सहा गावांनी लोकवर्गणी

कळंब : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गावांगावात जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. या कामासाठी कळंब तालुक्यातील सहा गावांनी लोकवर्गणी जमा केल्यानंतर या गावांना प्रत्येकी अडीच लाख रुपयाप्रमाणे १३ लाखांचा निधी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार फंडातून दिला आहे. जलसंधारणाच्या कामातून निर्माण होणाऱ्या स्त्रोताबद्दल स्थानिकांना आत्मियता रहावी, यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करावी, असे आवाहन आ. पाटील यांनी केले होते. या आवाहनानंतर कळंब तालुक्यातील शिराढोण, वडगाव सि; निपाणी, नायगाव, वाठवडा, पाडोळी या गावांनी लोकवर्गणी जमा केली. त्यामुळे आ. पाटील यांनी त्यांच्या फंडातून या गावाला जलसंधारणाच्या कामासाठी प्रत्येकी अडीच लाखाचा निधी दिला आहे. या गावाबरोबरच कळंब तालुक्यातील मस्सा, ईटकूर, मोहा, खामसवाडी या गावानींही लोकवर्गणीसाठी पुढाकार घेतला असून, या गावातील कामांसाठी खाजगी क्षेत्रातून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. दरम्यान कळंब तालुक्यात जलयुक्तमधून यंत्रणा स्तरावर मोठी कामे सुरू असतानाच तालुक्यातील २२ गावातील ग्रामस्थांनी जलसंधारणासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून, या गावातही लोकवर्गणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राप्त होणाऱ्या रकमेतून खोलीकरण, रुंदिकरण व सरळीकरणाची कामे करण्यात येणार असून, काही गावात नद्यातील गाळही लोकसहभागातून काढण्यात येणार आहे. यासाठी मस्सा व गोविंदपूर या गावात जलसंपदा विभागाची यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे इंधन व वाहतूक खर्च लोकसहभागातून भागविण्यात येत आहे. मस्सा येथे ३ तर गोविंदपूर येथे दोन कामे पूर्णत्वास आली असून, या दोन्ही ठिकाणी आणखी चार कामे प्रगतीपथावर आहेत. (प्रतिनिधी)