शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेच्या मोफत अंत्यविधी योजनेला घरघर

By admin | Updated: November 25, 2014 01:00 IST

औरंगाबाद : महापालिकेने जानेवारी २०१३ मध्ये सुरू केलेल्या मोफत अंत्यविधी योजनेस घरघर लागली आहे. प्रशासनाची अनास्था, वाढता खर्च आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे योजना

औरंगाबाद : महापालिकेने जानेवारी २०१३ मध्ये सुरू केलेल्या मोफत अंत्यविधी योजनेस घरघर लागली आहे. प्रशासनाची अनास्था, वाढता खर्च आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे योजना मरणासन्न अवस्थेत आहे. तातडीने याबाबत निर्णय घेतला नाहीतर योजनेचा ‘अंत’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात पाणीपुरवठा, रस्ते, पथदिव्यांची सेवा देण्यात मागे पडलेल्या पालिकेने मोफत अंत्यविधीची योजना २२ महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. १ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च त्या उपक्रमावर मनपा निधीतून आजवर करण्यात आला आहे. शहरातील ३४ स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात ३ हजार ६२२ अंत्यविधी करण्यात आले. चालू वर्षांत २ हजार ९५३ अंत्यविधी झाले आहेत.प्रत्येक विधीसाठी मनपा २५०० रुपयांचे अनुदान देत आहे. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च स्मशानजोग्यांच्या नावे काढण्यात आलेल्या बँक खात्यात जमा केला जातो. २ महिन्यांपासून स्मशानजोग्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. १६ लाख रुपयांची ती रक्कम आहे. योजना पालिकेने चालवावी यासाठी मालमत्ता विभागाशी जोडण्यात आली. मात्र, प्रशासनाने आरोग्य विभागामार्फत संचिका मंजुरीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.स्मशानजोग्यांनी आज उपमहापौर संजय जोशी यांची भेट घेऊन योजनेला लागलेल्या घरघरीला वाचा फोडली. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकूड, गौऱ्यांच्या पुरवठादारांची रक्कम थकल्याचे त्यांनी सांगितले. उपमहापौर जोशी म्हणाले, दोन दिवसांत याप्रकरणी निर्णय होईल. श्रीमंतांनी तरी दान करावे...मोफत अंत्यविधीची योजना गरिबांसाठी होती. मात्र, श्रीमंत किंवा ज्यांची २ हजार ५०० रुपये देण्याची ऐपत आहे. ते नागरिकदेखील मनपाच्या खात्यावर धनादेश किंवा रोख रक्कम टाकत नाहीत. २२ महिन्यांत १ लाख ४७ हजार रुपये मनपाच्या ५०१००००३४२२७४७ या खात्यावर जमा झाले आहेत. या काळात मनपाने अंत्यसंस्कार सामग्रीवर दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, विद्युत दाहिनीचा वापर केला पाहिजे. तशीच ही योजना मनपाच्या फायद्याची नाही. त्यामुळे याप्रकरणी पुनर्विचार झाला पाहिजे, असे आयुक्तांचे मत असल्याचे उपमहापौर म्हणाले. याप्रकरणी आयुक्तांशी संपर्क झाला नाही. कब्रस्तानांची सुरक्षा अधांतरीशहरात ३२ कब्रस्तान आहेत. त्या कब्रस्तानांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी २ सुरक्षारक्षक नेमण्यात येणार होते. मात्र, त्यासाठी मनपाने काहीही निर्णय घेतला नसल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांनी केला.