शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

वन विभागाच्यावतीने वनधन ‘रानमेवा’ जनतेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:27 IST

वन विभागाच्या वतीने पहिल्यांदाच वनधनाच्या विक्रीचे दुकान शहरात सुरू

ठळक मुद्दे वृक्षतोड रोखण्यासाठी उपक्रम जनधन, रोजगार निर्मितीवर लक्ष  

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : वन विभागाच्या वतीने पहिल्यांदाच वनधनाच्या विक्रीचे दुकान शहरात सुरू केले असून, यातून वन परिक्षेत्रातील वृक्षतोडीला आळा बसविणे, तसेच परिसरातील गावात रोजगार निर्मितीचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला आहे.   

वनक्षेत्रातील वृक्षतोड यावरच लक्ष केंद्रित करण्याशिवाय इतरही वनक्षेत्रातून रोजगार निर्मितीच्या साधनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यावर वन विभागाने नजर टाकली असून, अनेक गावांतील बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी बहुतांश खेड्यांत गॅससह शेगडीचे मोफत वाटप केलेले आहे. सामाजिक भाग म्हणून अजून आपण काही करू शकतो का, म्हणून ‘रानमेवा’ व्यर्थ वाया जातो किंवा रानातून डिंक, मध, चारुळी, बिबा, बांबू, सीताफळ, डिकेमाली, मुरडशेंग, आवळा, बेहडा, हिरडा, रोशा गवत, गुंज व पाला, करंज बी, निंबोळी, आंबा तसेच वनातील वनौषधी व वनधन विक्रीचे दुकान शहरात काढण्याचा पहिल्यांदा प्रयोग औरंगाबाद मुख्यालयात करण्यात आला आहे.   

वनौषधीचा फायदा  ३३ कोटी वृक्ष लागवडीचा यंदाचा उद्देश असून, त्याचे संगोपन व जोपासना करण्यासाठी वन विभाग मनुष्यबळाचा वापर करते, फक्त वृक्षतोड व अतिक्रमण या दोनच बाबींवर त्यांचे विशेष लक्ष असते. वन विभागात फळ, वनधनासह वनौषधींची अमाप संपत्ती असून, बहुतांश नागरिकांना त्याची ओळख नाही; परंतु स्थानिक नागरिकांना त्याचे महत्त्व, गुणधर्म माहीत आहेत. त्याचा फायदा रोजगारात घेऊन त्यांना रोजगार निर्माण करून देण्यावर भर आहे, असे मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांनी सांगितले.  

  बचत गटांच्या वस्तू  वनपरिक्षेत्रालगतच्या गावांतील महिला, बेरोजगार यांनी वनधन जमा करून त्या वस्तू ‘रानमेवा’ जनतेपर्यंत कसा पोहोचविता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रातील सामान्य नागरिकांना त्याचा फायदा मिळावा आणि वस्तूच्या बदल्यात बचत गटांनाही रोजगार मिळणार आहे. त्यातून वन विभागाला महसूलदेखील उपलब्ध होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव तांबे म्हणाले.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारfruitsफळे