शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

वन विभागाच्यावतीने वनधन ‘रानमेवा’ जनतेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:27 IST

वन विभागाच्या वतीने पहिल्यांदाच वनधनाच्या विक्रीचे दुकान शहरात सुरू

ठळक मुद्दे वृक्षतोड रोखण्यासाठी उपक्रम जनधन, रोजगार निर्मितीवर लक्ष  

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : वन विभागाच्या वतीने पहिल्यांदाच वनधनाच्या विक्रीचे दुकान शहरात सुरू केले असून, यातून वन परिक्षेत्रातील वृक्षतोडीला आळा बसविणे, तसेच परिसरातील गावात रोजगार निर्मितीचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला आहे.   

वनक्षेत्रातील वृक्षतोड यावरच लक्ष केंद्रित करण्याशिवाय इतरही वनक्षेत्रातून रोजगार निर्मितीच्या साधनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यावर वन विभागाने नजर टाकली असून, अनेक गावांतील बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी बहुतांश खेड्यांत गॅससह शेगडीचे मोफत वाटप केलेले आहे. सामाजिक भाग म्हणून अजून आपण काही करू शकतो का, म्हणून ‘रानमेवा’ व्यर्थ वाया जातो किंवा रानातून डिंक, मध, चारुळी, बिबा, बांबू, सीताफळ, डिकेमाली, मुरडशेंग, आवळा, बेहडा, हिरडा, रोशा गवत, गुंज व पाला, करंज बी, निंबोळी, आंबा तसेच वनातील वनौषधी व वनधन विक्रीचे दुकान शहरात काढण्याचा पहिल्यांदा प्रयोग औरंगाबाद मुख्यालयात करण्यात आला आहे.   

वनौषधीचा फायदा  ३३ कोटी वृक्ष लागवडीचा यंदाचा उद्देश असून, त्याचे संगोपन व जोपासना करण्यासाठी वन विभाग मनुष्यबळाचा वापर करते, फक्त वृक्षतोड व अतिक्रमण या दोनच बाबींवर त्यांचे विशेष लक्ष असते. वन विभागात फळ, वनधनासह वनौषधींची अमाप संपत्ती असून, बहुतांश नागरिकांना त्याची ओळख नाही; परंतु स्थानिक नागरिकांना त्याचे महत्त्व, गुणधर्म माहीत आहेत. त्याचा फायदा रोजगारात घेऊन त्यांना रोजगार निर्माण करून देण्यावर भर आहे, असे मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांनी सांगितले.  

  बचत गटांच्या वस्तू  वनपरिक्षेत्रालगतच्या गावांतील महिला, बेरोजगार यांनी वनधन जमा करून त्या वस्तू ‘रानमेवा’ जनतेपर्यंत कसा पोहोचविता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रातील सामान्य नागरिकांना त्याचा फायदा मिळावा आणि वस्तूच्या बदल्यात बचत गटांनाही रोजगार मिळणार आहे. त्यातून वन विभागाला महसूलदेखील उपलब्ध होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव तांबे म्हणाले.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारfruitsफळे