शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

पाच टक्के औरंगाबादकरांना काचबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:23 PM

डोळ्याच्या आतमध्ये वाढलेला दाब म्हणजे काचबिंदू (ग्लॉकोमा) होण्याची धोक्याची घंटा असते. त्या दाबामुळे दृष्टी चेतातंतू दाबले जाऊन आतील बाजूला इजा होते. काचबिंदूचा आजार नियंत्रित करता येत असला तरी ५ टक्के औरंगाबादकर या आजाराने ग्रासले आहेत. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येण्याची भीती असते, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.

ठळक मुद्देजागतिक काचबिंदू सप्ताह : चोरपावलांनी येणारा आजार, उपचाराअभावी अंधत्वांचा धोका

औरंगाबाद : डोळ्याच्या आतमध्ये वाढलेला दाब म्हणजे काचबिंदू (ग्लॉकोमा) होण्याची धोक्याची घंटा असते. त्या दाबामुळे दृष्टी चेतातंतू दाबले जाऊन आतील बाजूला इजा होते. काचबिंदूचा आजार नियंत्रित करता येत असला तरी ५ टक्के औरंगाबादकर या आजाराने ग्रासले आहेत. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येण्याची भीती असते, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.१० ते १६ मार्चदरम्यान जागतिक काचबिंदू सप्ताह पाळण्यात येत आहे. जनजागृतीमुळे मोतीबिंदूविषयी सर्वसामान्यांना माहिती आहे. डोळ्यात दिसणाऱ्या डागामुळे मोतीबिंदू लगेच लक्षात येतो; परंतु काचबिंदू सहज लक्षात येत नाही. काचबिंदू हा आजार चोरपावलांनी येणारा आजार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे डोळ्यातील नसांवर (आॅप्टिक नर्व्ह) दुष्परिणाम होऊन दृष्टी कमी होते. उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केल्यास कायमची दृष्टी जाण्याचा धोका असतो. काचबिंदू हा कधी कळत नाही. वयाच्या ३५ वर्षांपासून वर्षातून एकदा डोळ्यांची नियमित तपासणी करावी, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले.आजार लक्षात येत नाहीमोतीबिंदू हा लगेच लक्षात येतो; परंतु काचबिंदू लगेच लक्षात येत नाही. हा आजार हळूहळू वाढतो. यात डोळ्यावर ताण वाढतो. यावर औषधोपचार के ला जातो; परंतु औषधोपचाराने फरक पडला नाही तर शस्त्रक्रियेची वेळ येते, असे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. गोल्हाईत यांनी सांगितले.चाळिशीनंतर अधिक धोकाकाचबिंदूच्या रुग्णांचे प्रमाण चार ते पाच टक्के आहे. वयाच्या चाळिशीनंतर हा आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. वेळेवर उपचाराअभावी दृष्टी जाण्याचा धोका असतो, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ आणि औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटनेचे कोषाध्यक्ष केदार नेमीवंत यांनी दिली.हळूहळू अंधत्वकाचबिंदूमुळे हळूहळू अंधत्व वाढत जाते. घरातील सदस्यांना काचबिंदू असेल तर कुटुंबातील सदस्यांनीही वेळीच खबरादारी घेतली पाहिजे. त्याबरोबर मधुमेह रुग्णांनाही काचबिंदू होण्याची अधिक शक्यता असते. कमी वयातही काचबिंदू आढळत आहे, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. सोनाली भांगे यांनी सांगितले.काचबिंदूची लक्षणेडोळे दुखणे, डोळे लाल होणे, अंधूक दिसणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, दिव्याभोवती वर्तुळे दिसणे.काचबिंदू कोणाला होऊ शकतो?- कुटुंबात कोणाला काचबिंदू झालेला असल्यास अनुवंशिकतेमुळे शक्यता.- ४० वर्षांवरील व्यक्तींना.- मधुमेह, रुक्तदाबाचे रुग्ण.- डोळ्यांना दुखापत झाल्यास.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य