शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यासाठी बहीण-भावाची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: March 26, 2015 00:57 IST

संजय खाकरे , परळी विक्रमी ऊस गाळपामुळे नावाजल्या गेलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सत्ता गाजविण्यासाठी बहीण-भावांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे

संजय खाकरे , परळीविक्रमी ऊस गाळपामुळे नावाजल्या गेलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सत्ता गाजविण्यासाठी बहीण-भावांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सत्ता राखण्याचे आव्हान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यापुढे आहे तर अस्तित्व सिद्ध करण्याचे कसब विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दाखवावे लागणार आहे.स्व. गोपीनाथ मुंडे यांनी युती सरकारच्या काळात वैद्यनाथ साखर कारखान्याची उभारणी केली. १६ वर्षांपासून कारखान्यावर मुंडे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होत असलेली संचालक मंडळाची निवडणूक गाजू लागली आहे. २१ संचालक पदांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी जेष्ठ संचालक पंडितराव मुंडे व कार्यकारी संचालक डी. डी. कुलकर्णी यांच्यात ठिणगी पडली. त्याचे रूपांतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात झाले. त्यामुळे ही निवडणूक अधिकच संवेदनशील बनली आहे.दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत वैद्यनाथ कारखान्यावरील निर्विवाद वर्चस्वाला धक्का पोहचू नये यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार डॉ. प्रीतम मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे यांनी व्यूहरचना आखली आहे. दुसरीकडे जेष्ठ संचालक पंडितराव मुंडे यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विद्यमान संचालक मंडळाला हादरा देण्यासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे स्वतंत्र पॅनल आखाड्यात उतरविण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास निवडणुकीत आणखीच रंग भरणार आहेत.तथापि, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे कारखाना निवडणुकीत आमनेसामने आल्यामुळे तिसऱ्या पॅनलची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मुंडे विरूध्द मुंडे अशा सरळ लढतीची चिन्हे आहेत. जोरदार चुरसवैद्यनाथ कारखान्यावर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा एकछत्री अंमल राहिलेला आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी कारखान्यातील राजकारण जवळून अनुभवलेले आहे. इकडे जेष्ठ संचालक पंडितराव मुंडे यांनी एकेकाळी कारखान्यावर हुकूमत गाजवलेली आहे. ते कधी महत्त्वाच्या पदावर नव्हते परंतु कारखाना प्रशासनावर वचक होता. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.२१ संचालकांच्या निवडणुकीत ८ हजार ४१२ इतके मतदार मतदान करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च आहे. ३० मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून, १ ते १५ एप्रिल दरम्यान अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.तीन दिवसांत १६६ अर्जांची विक्री४बुधवारी संचालक पदाच्या निवडणुकीसाठी एकाच दिवशी ९६ अर्जांची विक्री झाली. तीन दिवसांत आतापर्यंत १६६ अर्ज विक्री झाले आहेत. केवळ पंडितराव मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे