शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
5
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
6
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
7
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
8
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
9
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
11
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
12
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
13
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
14
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
15
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
16
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
17
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
18
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
19
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
20
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आरक्षण उठविण्याचा, पदोन्नतीचा ‘तो’ ठराव रद्द

By admin | Updated: December 23, 2014 00:28 IST

औरंगाबाद : लोकमतने १८ डिसेंबरपासून या दोन्ही ठरावांप्रकरणी वृत्तमालिका प्रकाशित करून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेला वेंधळा कारभार चव्हाट्यावर आणला होता.


औरंगाबाद : लोकमतने १८ डिसेंबरपासून या दोन्ही ठरावांप्रकरणी वृत्तमालिका प्रकाशित करून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेला वेंधळा कारभार चव्हाट्यावर आणला होता.
२० डिसेंबरच्या सभेतच मोठ्या आर्थिक उलाढालींचे ते दोन्ही ठराव रद्द करण्यात येणार होते. परंतु प्लॅन करून ती सभा उधळण्यात आली. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी महापौरांनी गोडीगुलाबीने सभा संपविणे आणि वादग्रस्त विषय व इतिवृत्त रद्द करण्याप्रकरणी उपमहापौर संजय जोशी, गटनेते मीर हिदायत अली, सभागृह नेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, संजय केणेकर, आयुक्त पी. एम. महाजन, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दीकी, मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांची एक बैठक घेतली. त्या बैठकीतच दोन्ही ठरावांचे इतिवृत्त रद्द करण्याचा निर्णय झाला होता.
दिले घेतले तर गोड...
६६५, ६६६ क्रमांकाचे विषय ११ नोव्हेंबर रोजी ऐनवेळी घुसविले. मनपाच्या रेकॉर्डिंगमध्ये कुठेही हे विषय दिसलेले नाहीत.
क्रांतीचौकातील आरक्षित भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा ठरावही ऐनवेळीच आणला. मनपाचा प्रवर्ग ‘ड’ मधून ‘क’ मध्ये आला आहे. त्यामुळे सहा.संचालक नगररचना हे पद शासनाकडून मिळेल. परंतु सत्ताधाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांचा प्रस्ताव सभेपुढे आणला. ठरावाचे इतिवृत्त रद्द करण्याचा अधिकार महापौरांना नाही. ३ महिन्यांपर्यंत त्यावर काहीही निर्णय होत नाही. दिले घेतले तर गोड नाही तर कडू असा प्रकार आज सभेत घडल्याचा आरोप नगरसेवक काशीनाथ कोकाटे यांनी केला. तर खाजा शरफोद्दीन यांनी या प्रकरणी महापौरांच्या राजीनाम्याची व ठराव कुणाच्या आदेशाने रद्द केला याच्या चौकशीची मागणी केली.
महापौरांनी पळ काढला...
भाजपा नगरसेवक प्रशांत देसरडा यांनीही महापौरांवर आरोप केले. युतीत असतानाही देसरडा यांनी महापौरांनी सभेतून पळ काढल्याचा आरोप केला.
शहरातील अनेक महत्त्वांच्या विषयावर सभेत बोलायचे असताना त्यांनी बेकायदेशीररीत्या सभा तहकूब केल्याचे ते म्हणाले. नगरसेवक समीर राजूरकर म्हणाले, महाराष्ट्र मनपा अधिनियमातील प्रकरण २ च्या पहिल्या मुद्यातील कलम ‘र ’ नुसार ३ महिन्यांपूर्वी पारित ठराव रद्द करता येत नाहीत. वादग्रस्त ठरावांप्रकरणी मतदान घेता आले असते. परंतु तसे न करता महापौरांनी सभा गुंडाळली.