शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची चिंता मिटली; जायकवाडी धरणातून दोन्ही कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:05 IST

नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

पैठण : येथील जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाल्याने खरीप हंगामासाठी उजवा कालव्यात २०० क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेक बुधवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात यावर्षी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे सिंचनासाठी धरणाच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही कालव्यात पाणी सोडण्याची मागणी विविध आमदारांनी केली होती. त्यानंतर मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जायकवाडीच्या उजवा कालव्यात २०० क्युसेकने तर डाव्या कालव्यात सायंकाळी पाच वाजता १०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, उपविभागीय अभियंता श्रद्धा निंबाळकर, शाखा अभियंता मंगेश शेलार, गणेश खराडकर, आबासाहेब गरुड, अब्दुल बारी गाझी, संजय चव्हाण, रामनाथ तांबेआदींची उपस्थिती होती. या पाण्यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांमधील जवळपास २ लाख ४० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होणार असल्याचे कार्यकारी अभियंता संत म्हणाले.

डाव्या कालव्यास अधिक फायदा
डावा कालवा २०८ किलोमीटर आहे. या कालव्याचा छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रास फायदा होणार आहे. तर उजवा कालवा १३२ किलोमीटरचा असून यामुळे छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागातील ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फायदा होणार आहे.

सिंचनासाठी फायदा 
खरीप हंगाम २०२५-२६ साठी उजवा व डावा कालव्याद्वारे पाणी पाळी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. सदरील पाणी पाळी ही ९ ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. जवळपास २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी याचा फायदा होणार आहे.
-प्रशांत संत, कार्यकारी अभियंता

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर