शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

शेतकरी दुहेरी संकटात; पावसाची शक्यता अन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 7:43 PM

Bad weather in Aurangabad : अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, कपाशी, अद्रक, सोयाबीन, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद : दिवाळी होऊन पंधरा दिवस उलटले तरीही म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली असून, काढणीला आलेला कापूस हातात येईल की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

अतिवृष्टीने कापूस, तूर, बाजरी, मका आदी पिके हातची गेली. जी वाचली त्यातही उत्पादनात मोठी घट झाली. त्यातून लागवड खर्चही निघण्याची शक्यता नाही. अशात पुन्हा वातावरण बिघडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला असून थंडी नसल्याने रबीच्या पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, कपाशी, अद्रक, सोयाबीन, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातून वाचलेल्या कपाशी पिकाला आता कुठे कापूस फुटला आहे. त्याच्या वेचणीची लगबग सुरू असतानाच वातावरण बदलल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. गत चार-पाच दिवसांपासून किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा पंखे सुरू केले आहेत. अंशतः रोज ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणामयंदाच्या मौसमातील थंडी गेल्या काही दिवसांपासून जाणवायला लागली होती; परंतु तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर, गहू, ज्वारी आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी