शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 7:09 PM

नापिकी आणि कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या

सोयगाव : सोयगावसह तालुक्यात दुष्काळाच्या दाहकतेने खरीप उत्पादक शेतकऱ्यांनी नापिकीची धास्ती घेतली आहे. यातच डोक्यावर कर्ज असल्याने आलेल्या नैराश्यातून तीन दिवसात तालुक्यातील ३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून शेतकरी आणि मजुरांनी हातांना काम नसल्याने स्थलांतर सुरु केले आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारातून शेतकरी आत्महत्या या मुद्द्याच गायब झाल्याचे चित्र आहे.  

गुरुवारी पहाटे निंबायती येथील तरुण शेतकरी जगन सदू जाधव (३६  ) याने  पिकांची स्थिती पाहून आणि खासगी बँकांच्या वसुलीचा तगादा सहन न झाल्याने गळफास घेवून आत्महत्या केली. गेल्या चार दिवसापासून खासगी बँकेकडून त्याच्या मागे वसुलीचा तगादा लावल्याचे त्याच्या मुलीने सांगितले. गुरुवारी शेतात गेल्यावर कपाशी पिकांची गंभीर स्थिती पाहून बँकेकडून घेतलेले पिककर्ज व खासगी बँकाकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. 

दरम्यान, दोन दिवसापूर्वी सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणामुळे पळसखेड येथील वैजिनाथ थोरात(३१) आणि पहुरी येथील २१ वर्षीय भगवान जाधव या दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. ऐन निवडणुका आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या तोंडावर सोयगाव तालुक्यात दुष्काळाच्या धास्तीने तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळ्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

निवडणुकांच्या कामाने पंचनामे रखडलेमहिनाभरापासून तलाठी व महसूल विभाग निवडणुकांच्या कामांमध्ये गुंतला आहे. यामुळे तिन्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अहवाल पाठविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद