शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

भावकीच्या जुन्या वादातून शेतकर्‍याचा खून

By admin | Updated: May 14, 2014 00:41 IST

जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे भावकीच्या जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात अंकुश भिकाजी चिडे यांच्यावर कुºहाड व विळ्याने हल्ला करण्यात आला.

जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे भावकीच्या जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात अंकुश भिकाजी चिडे यांच्यावर कुºहाड व विळ्याने हल्ला करण्यात आला. घाटी दवाखान्यात घेऊन जातांना करमाड येथे ते मरण पावले. ही घटना १२ मे २०१४ रोजी रात्री ९.३० वाजता घडली. अहंकार देऊळगाव येथे चिडे कुटुंबांची शेती आहे. सर्वांची शेती लगत असल्यामुळे सर्वांनाच एक - दुसर्‍याच्या शेतातून जावे लागते. काही जणांनी रस्ता अडवून वाद निर्माण केला होता. हे प्रकरण प्रचंड विकोपाला गेले. ३ मार्च रोजी चिडे कुटुंबियांच्या दोन गटात किरकोळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकां विरोधात तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दोन्ही गटांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही दिवस वाद थांबला होता. १२ मे रोजी रात्री अंकुश चिडे यांच्या शेत वस्तीवरील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे ते रोहित्रावर गेले. त्यांनी रोहित्रावरील उडालेला फ्यूज बसविला. तेथून परत येत असतांना त्यांना गोरखनाथ माधवराव चिडे याने अटकाव केला. आमच्या शेतातून का जातोस म्हणून वाद घातला. एवढ्यात माधवराव शेकूजी चिडे व कासाबाई माधवराव चिडे हे दोघे कुºहाड व विळा हातात ेघेऊन आले. आईच्या हातातील कुºहाड घेऊन गोरखनाथ चिडे याने अंकुश चिडेवर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याचे पाहून शेत वस्तीवरून संगीता अंकुश चिडे व संतोष भिकाजी चिडे हे धावत घटनास्थळी आले. त्यांच्यावरही हल्ला करून जखमी करण्यात आले. या सर्व जखमींना जालना येथे खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र अंकुश भिकाजी चिडे (३५) यांची प्रकृती गंभीर असल्याने सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले. रुग्णाची गंभीर अवस्था पाहून नातेवाईकांना औरंगाबाद येथे घाटी दवाखान्यात जाण्याचा वैद्यकीय अधिकार्‍यांनी सल्ला दिला. अंकुश चिडे यांना औरंगाबादला घेऊन जात असतानाच रात्री २ वाजेच्या सुुमारास त्यांचे करमाड येथे निधन झाले. त्यामुळे नातेवाईकांनी गाडी परत फिरवून जालना येथे सरकारी दवाखान्यात मृतदेह आणला. सदर प्रकरणात तालुका जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन जायभाये यांच्यासह कमलाकर अंभोरे, ज्ञानदेव नागरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकांना शांत केले. पूर्वी दाखल केलेला भादवि कलम ३०७ गुन्ह्यात भादंवि कलम ३०२ नुसार नोंद घेतली. यात आरोपी गोरखनाथ, माधवराव व कासाबाई यांना अटक करण्यात आली. अधिक तपास जायभाये करीत आहेत. (प्रतिनिधी)