शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार उपसा सुरुच..!

By admin | Updated: November 5, 2014 00:57 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा केवळ ५८ टक्के पाऊस झाल्याने २८ प्रकल्प कोरडे असून, ६६ प्रकल्पातील पाणीसाठा ज्योत्याखाली असल्याने येणाऱ्या दिवसात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा केवळ ५८ टक्के पाऊस झाल्याने २८ प्रकल्प कोरडे असून, ६६ प्रकल्पातील पाणीसाठा ज्योत्याखाली असल्याने येणाऱ्या दिवसात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. अशावेळी उपलब्ध पाणीसाठ्याची जपवणूक करण्याची आवश्यकता असताना अनेक प्रकल्पातून अवैध पद्धतीने पाण्याचा बेसुमार उपसा सुरु असल्याचे चित्र आहे. टंचाई निवारणार्थ लाखोंचे आराखडे तयार होत असताना प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य संरक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख प्रकल्पावर मंगळवारी भेट दिली असता, अनेक ठिकाणी विद्युत मोटारींद्वारे शेतकरी पाणी खेचत असल्याचे दिसून आले.पांडुरंग पोळे ल्ल नळदुर्गप्रशासन संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी लाखोंचे आराखडे तयार करीत असताना धरणातील उपलब्ध पाण्याची जपवणूक करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शेजारच्या बोरी धरणातून दररोज लाखो लिटर पाणी खेचले जात असून, अनधिकृत विद्युत पुरवठ्यामुळे विद्युत वितरण कंपनीलाही दररोज हजारो रुपयांचा चुना लागत आहे.यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक तलाव, धरणे कोरडी आहेत. सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या तुळजापूर, नळदुर्ग व अणदूर गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या बोरी धरणात आज रोजी २० टक्के पाणीसाठा असून तो एकूण साठवण क्षमतेच्या अवघा ६.५ दसलक्ष घनमिटर इतका आहे. येणाऱ्या ८ महिन्यांच्या काळाकरिता या धरणातून तुळजापूर, नळदुर्ग व अणदूर गावांना पाणी पुरवठा करावयाचा आहे. दरमाणसी प्रतिदिनी ४० लिटर पाण्याचा विचार करता, या धरणातून केवळ ६ महिने पाणी मिळू शकते. असे असताना पाटबंधारे विभाग पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत उदासीन असल्याचे दिसते. सध्या धरणावर जवळपास १५० विद्युत मोटारी आहेत. मात्र विद्युत वितरण कंपनीने केवळ ९७ ग्राहकांना विद्युत पुरवठा केला आहे. उर्वरित ५३ कनेक्शन हे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेहरबानीवर सुरु असल्याची चर्चा आहे.पाटबंधारे विभागाकडे असलेल्या नोंदीतही लाभार्थी संख्या कमी आहे. मात्र वास्तवात ती त्याच्या अभिलेखावरील संख्येच्या दुप्पट असल्याचे बोलले जाते. या सर्वच प्रकाराकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. आहे त्या पाण्याचा जपून वापर न करता पाणी टंचाईवर कोट्यावधी रुपयाची उधळण करण्यासाठीच हा कानाडोळा असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. धरणावर लावलेल्या मोटारीतून अशाचप्रकारे पाणी उपसा राहिल्यास नागरिकांना येणाऱ्या काळात गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, धरणातील पाणी साठ्याच्या वापरावरील निर्बंधाबाबत कसल्याही सूचना मिळाल्या नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या नळदुर्ग कार्यालयाने दिली.