शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसाह्यासाठी समान व असमान निधी योजना

By admin | Updated: August 21, 2014 01:20 IST

जालना : सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसाह्य मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने समान निधी व असमान निधी योजना राबविण्यात येत असून विविध उपक्रमांना हा

जालना : सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसाह्य मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने समान निधी व असमान निधी योजना राबविण्यात येत असून विविध उपक्रमांना हा निधी देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता अंतर्गत सदर योजनेद्वारे दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. समान निधी योजनेमध्ये प्रत्येकी ५० टक्के निधी राज्य शासन व प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येतो. यामध्ये परिसंवाद, चर्चासत्रे व कार्यशाळा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन व ग्रंथ प्रदर्शने तसेच वाचनसंस्कृती रूजविण्यासाठीचे उपक्रम, सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार/बांधणीसाठी अर्थसहाय्य, फिरते ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्याचा समावेश आहे. असमान निधी योजनेमध्ये ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून करण्यात येणारे अर्थसहाय्य प्रतिष्ठानच्या वतीने ७५ टक्के तर इच्छूक ग्रंथालयाचा हिस्सा २५ टक्के असतो. सार्वजनिक ग्रंथालयातील बालविभाग, महिला विभाग, ज्येष्ठ नागरिक विभाग, नवसाक्षर विभाग, स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग इत्यादींसाठी प्रतिष्ठानकडून शंभर टक्के अर्थसहाय्य देण्यात येते. असमान निधी अंतर्गत प्रतिष्ठानच्या सहाय्याने बाल विभाग स्थापन करण्यासाठी देखील सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय्य देण्यात येते. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींसाठी विभाग स्थापन करण्यासाठी ग्रंथालयांना अर्थसहाय्य देण्यात येते.या योजनांबाबत इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रतिष्ठानच्या ६६६.१११’ा.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर नियम, अटी व अर्जाचा नमूना उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात एकूण ४४४ सार्वजनिक वाचनालये आहेत. मात्र गेल्या एक-दीड वर्षांपूर्वी महसूल प्रशासनाने वाचनालयांची तपासणी करून ५१ वाचनालयांची मान्यता रद्द केली होती. या वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर निर्णयाला आव्हान दिलेले असले तरी सद्यस्थितीत या योजनेत त्यांना सहभागी होता येणार नाही, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.एस. ठाकूर यांनी सांगितले. योजनेचा लाभ घेण्यासाठी अन्य वाचनालयांकडे किमान ३ हजार पुस्तक संख्या असणे आवश्यक आहे.