शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी एमआयएमकडून इम्तियाज जलील ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 2:42 PM

रात्री आठ वाजता पुन्हा एकदा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

औरंगाबाद : एमआयएमच्या हैदराबाद येथील पक्ष कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता औरंगाबाद लोकसभा संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडले. उमेदवार म्हणून आमदार जलील योग्य असल्याचे नमूद केले. 

आज सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील एमआयएमच्या दार-उस्स- सलाम या पक्ष कार्यालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयएमचे सर्व २३ नगरसेवक, पक्षनेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खा. असदोद्दीन ओवेसी प्रचारात व्यस्त आहेत. हैदराबाद येथे त्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम सुरू केले आहे. त्यातच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी, असा स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. 

रात्री होणार अंतिम निर्णय जिल्ह्यातील मुस्लिम, दलित मतांची संख्याही काढण्यात आली आहे. लोकसभेला ५२ ते ५५ टक्के मतदान होते. मतदानाची ही टक्केवारी गृहीत धरून उमेदवार निवडून येऊ शकतो का? याचेही गणित एमआयएम कार्यकर्ते यांनी पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या समोर आज झालेल्या सभेत मांडले. खासदार ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडले. उमेदवार म्हणून आमदार जलील योग्य असल्याचे नमूद केले. रात्री आठ वाजता पुन्हा एकदा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

एमआयएमच्या निर्णयाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्षऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास तिरंगी लढत पाहायला मिळेल. एमआयएम पक्षप्रमुखांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास या मतदारसंघात पारंपरिक सेना विरुद्ध काँग्रेस, अशी लढत पाहायला मिळेल. मुस्लिम, दलित मतांचे विभाजन झाल्यास याचा थेट फायदा युतीच्या उमेदवाराला होईल, असेही जाणकारांचे मत आहे. प्रत्येक निवडणुकीत सेनेला मत विभाजनाचा चांगलाच फायदा झालेला आहे. यंदाही त्रिकोणी लढत होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबाद