शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

पावसाळ्यात मुकुंदनगर, राजनगरवासीयांचे होताहेत हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 19:14 IST

चिखल तुडवत करावे लागतेय मार्गक्रमण

ठळक मुद्देपाणी, रस्ते, दिव्यांचा अभाव  पाणी साचून तुटतो संपर्कआबालवृद्धांची गैरसोय

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मुकुंदनगर, राजनगरातील नागरिकांचा पावसाळ्यात शहराशी संपर्क तुटतो. शाळकरी चिमुकल्यांना चिखलातून वाट काढीत शाळा गाठावी लागते. तर कामगारांना मुकुंदवाडी रेल्वेगेटच्या अलीकडील परिसरात वाहने उभी करण्याशिवाय गत्यंतर नाही.  

शहरालगतच्या नवीन वसाहतीचा मनपात समावेश करून २० ते २५ वर्षांचा कालावधी लोटला. परंतु त्या वसाहतीच्या विकासाकडे स्थानिक प्रशासनाने सतत दुर्लक्ष केले. मुकुंदनगर, राजनगरातून बीड बायपासला जाताना हालहाल होतात, अनेकदा वाहने चिखलात रुतलेल्या अवस्थेत सोडून द्यावी लागतात. त्यामुळे वाहनातील पेट्रोल किंवा इतर साहित्याची चोरीदेखील कायमचीच बाब झाली आहे. मनपाने या भागात गुंठेवारी लावून मुकुंदनगर, राजनगर, मुर्तुजापूर, स्वराजनगर परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. परंतु कुणीही या नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे विष्णू गाडगे, सौरभ सौदे, सुशील भालेराव यांच्यासह स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

चिखलामुळे होते कसरतया परिसरात मनपाची शाळा नाही. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयासाठी पटरीपलीकडे स्वत: नेऊन शाळेत सोडावे लागते. पटरीलगत चालणाऱ्यांना अतिदक्षतापूर्वक ये-जा करावी लागते. अन्यथा अपघाताचे प्रसंगही ओढावले आहेत. पायातील चपला, बूट काढून मुलांना अनवाणी पायाने शाळेपर्यंत न्यावे लागते. ही जीवघेणी कसरत महानगरपालिका केव्हा थांबविणार, असा सवाल शिवाजी जाधव, कृष्णा पवार, सुरेश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

दूध व गॅससाठी रस्त्यावरचिखलामुळे दूध व गॅस व पाण्याचे जार घेऊन फिरणारी वाहने घरापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यामुळे रेल्वेगेटजवळ डांबरी रस्त्यावर थांबलेल्या वाहनातून साहित्य घेऊन जाण्याची कसरत करावी लागते. मुकुंदनगर व राजनगरला मूलभूत सेवा- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कविता कीर्तिशाही, बबिता राठोड, संगीता जाधव आदींनी केली आहे. 

भुयारी रस्ता करावामुकुंदवाडी रेल्वेस्थानक ते राजनगर, मुकुंदनगर परिसरातील नागरिकांना गेट ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नाही. पादचारी रेल्वेरुळावरून जीवघेणा प्रवास करतात. गंभीर आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका घरापर्यंत जात नाही. वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णाला खांद्यावर उचलून डांबरी रस्त्यापर्यंत आणावे लागते. त्यामुळे भुयार बनवून रस्ता करावा. -शैलेश भालेराव 

सेवा-सुविधा कोसोदूर परिसरातील एकही रस्ता व्यवस्थित नसल्याने पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते किंवा पायपीट करीत शाळा गाठावी लागते. त्यासाठी पालकांना सर्व कामे सोडून अधिक त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या कार्यक्षेत्रात असूनही सेवा-सुविधांपासून नागरिकांना कोसोदूर ठेवण्यात आलेले आहे. धोकादायक डीपींना कुंपण लावण्याची गरज आहे.- आशिष चव्हाण

अविकसित परिसरकामगार व मजूर कुटुंबियाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून, चिखलामुळे रस्त्यावर वाहन चालविता येत नाही. घराजवळ चिखल असल्याने वाहन घरीच ठेवून पायपीट करीत कामावर जाण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर पावसाळ्यात येते. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्वरित रस्ता, ड्रेनेज, लाईट सेवा मनपाने पुरवाव्यात.- डॉ. सूरज स्वामी 

गैरसोयीत वाढरस्त्याचे सिमेंटीकरण होणार असून, बायपासपर्यंत सोयीचा होणार आहे. परंतु ठेकेदाराने टाकलेल्या खडीमुळे त्यातून वाहनाला वाट काढणे कठीण झाले आहे. दुचाकीने वाट काढता येऊ शकते. परंतु चारचाकी वाहनाला वळसा घेऊनच देवळाई किंवा झाल्टा फाटामार्गे जालना रोडवरून स्वराजनगर, राजनगर, मुकुंदनगर गाठावे लागत आहे. - शेख आक्रम 

डीपीला कुंपण नाहीपरिसरात एकही डांबर व सिमेंट रोड तयार करण्यात आलेला नाही. चिखलमय रस्त्यालगत उघड्या डीपी आहेत. शाळकरी मुले आणि नागरिकांना रस्त्यावरून जाताना धोका होण्याची भीती वाढली आहे. परिसरातील उघड्या डीपीसाठी संरक्षक कुंपण लावण्याची मागणी केली; परंतु त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. - साहेबराव कांबळे

 

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका