शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

पावसाळ्यात मुकुंदनगर, राजनगरवासीयांचे होताहेत हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 19:14 IST

चिखल तुडवत करावे लागतेय मार्गक्रमण

ठळक मुद्देपाणी, रस्ते, दिव्यांचा अभाव  पाणी साचून तुटतो संपर्कआबालवृद्धांची गैरसोय

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मुकुंदनगर, राजनगरातील नागरिकांचा पावसाळ्यात शहराशी संपर्क तुटतो. शाळकरी चिमुकल्यांना चिखलातून वाट काढीत शाळा गाठावी लागते. तर कामगारांना मुकुंदवाडी रेल्वेगेटच्या अलीकडील परिसरात वाहने उभी करण्याशिवाय गत्यंतर नाही.  

शहरालगतच्या नवीन वसाहतीचा मनपात समावेश करून २० ते २५ वर्षांचा कालावधी लोटला. परंतु त्या वसाहतीच्या विकासाकडे स्थानिक प्रशासनाने सतत दुर्लक्ष केले. मुकुंदनगर, राजनगरातून बीड बायपासला जाताना हालहाल होतात, अनेकदा वाहने चिखलात रुतलेल्या अवस्थेत सोडून द्यावी लागतात. त्यामुळे वाहनातील पेट्रोल किंवा इतर साहित्याची चोरीदेखील कायमचीच बाब झाली आहे. मनपाने या भागात गुंठेवारी लावून मुकुंदनगर, राजनगर, मुर्तुजापूर, स्वराजनगर परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. परंतु कुणीही या नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे विष्णू गाडगे, सौरभ सौदे, सुशील भालेराव यांच्यासह स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

चिखलामुळे होते कसरतया परिसरात मनपाची शाळा नाही. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयासाठी पटरीपलीकडे स्वत: नेऊन शाळेत सोडावे लागते. पटरीलगत चालणाऱ्यांना अतिदक्षतापूर्वक ये-जा करावी लागते. अन्यथा अपघाताचे प्रसंगही ओढावले आहेत. पायातील चपला, बूट काढून मुलांना अनवाणी पायाने शाळेपर्यंत न्यावे लागते. ही जीवघेणी कसरत महानगरपालिका केव्हा थांबविणार, असा सवाल शिवाजी जाधव, कृष्णा पवार, सुरेश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

दूध व गॅससाठी रस्त्यावरचिखलामुळे दूध व गॅस व पाण्याचे जार घेऊन फिरणारी वाहने घरापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यामुळे रेल्वेगेटजवळ डांबरी रस्त्यावर थांबलेल्या वाहनातून साहित्य घेऊन जाण्याची कसरत करावी लागते. मुकुंदनगर व राजनगरला मूलभूत सेवा- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कविता कीर्तिशाही, बबिता राठोड, संगीता जाधव आदींनी केली आहे. 

भुयारी रस्ता करावामुकुंदवाडी रेल्वेस्थानक ते राजनगर, मुकुंदनगर परिसरातील नागरिकांना गेट ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नाही. पादचारी रेल्वेरुळावरून जीवघेणा प्रवास करतात. गंभीर आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका घरापर्यंत जात नाही. वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णाला खांद्यावर उचलून डांबरी रस्त्यापर्यंत आणावे लागते. त्यामुळे भुयार बनवून रस्ता करावा. -शैलेश भालेराव 

सेवा-सुविधा कोसोदूर परिसरातील एकही रस्ता व्यवस्थित नसल्याने पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते किंवा पायपीट करीत शाळा गाठावी लागते. त्यासाठी पालकांना सर्व कामे सोडून अधिक त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या कार्यक्षेत्रात असूनही सेवा-सुविधांपासून नागरिकांना कोसोदूर ठेवण्यात आलेले आहे. धोकादायक डीपींना कुंपण लावण्याची गरज आहे.- आशिष चव्हाण

अविकसित परिसरकामगार व मजूर कुटुंबियाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून, चिखलामुळे रस्त्यावर वाहन चालविता येत नाही. घराजवळ चिखल असल्याने वाहन घरीच ठेवून पायपीट करीत कामावर जाण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर पावसाळ्यात येते. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्वरित रस्ता, ड्रेनेज, लाईट सेवा मनपाने पुरवाव्यात.- डॉ. सूरज स्वामी 

गैरसोयीत वाढरस्त्याचे सिमेंटीकरण होणार असून, बायपासपर्यंत सोयीचा होणार आहे. परंतु ठेकेदाराने टाकलेल्या खडीमुळे त्यातून वाहनाला वाट काढणे कठीण झाले आहे. दुचाकीने वाट काढता येऊ शकते. परंतु चारचाकी वाहनाला वळसा घेऊनच देवळाई किंवा झाल्टा फाटामार्गे जालना रोडवरून स्वराजनगर, राजनगर, मुकुंदनगर गाठावे लागत आहे. - शेख आक्रम 

डीपीला कुंपण नाहीपरिसरात एकही डांबर व सिमेंट रोड तयार करण्यात आलेला नाही. चिखलमय रस्त्यालगत उघड्या डीपी आहेत. शाळकरी मुले आणि नागरिकांना रस्त्यावरून जाताना धोका होण्याची भीती वाढली आहे. परिसरातील उघड्या डीपीसाठी संरक्षक कुंपण लावण्याची मागणी केली; परंतु त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. - साहेबराव कांबळे

 

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका