शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रियेचा खोडा

By admin | Updated: April 12, 2016 00:37 IST

राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आॅनलाईन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे जमा केलेल्या अर्जांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

राजेश खराडे , बीडमागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आॅनलाईन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे जमा केलेल्या अर्जांची संख्या हजारोंच्या घरात आहे. योजनेचे केवळ तीन दिवस उरले असताना जिल्ह्यात केवळ २६९ शेततळ्यांच्या कामांना सुरवात झाली आहे. अनेक शेततळी प्रक्रियेत रखडलेली आहेत. योजनेला सुरुवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. अनुदान रक्कम तोकडी असल्याने अगोदरच शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवली आहे. आॅनलाईन ७८५०, तर प्रत्यक्ष कार्यालयात ३७६० अर्ज दाखल झाले आहेत. योजना शेवटच्या टप्प्यात आली तरी २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना जिल्हाभरात केवळ २६९ शेततळ्यांचा कार्यारंभ झाला आहे. २९ फेब्रुवारीपासून आॅनलाईन अर्ज येण्यास प्रारंभ झाला होता. आॅनलाईनचा घोळ शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्याने एकाच अर्जदाराने अनेक वेळा अर्ज भरले आहेत. त्यामुळे आॅनलाईन प्रस्तावांचा आकडा फुगलेला आहे. अर्ज दाखल होताच त्यानुसार त्याची मोका तपासणी, क्षेत्रीय तपासणी करून पात्र- अपात्र, अर्जांची यादी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडून तांत्रिक अडचणी सोडविल्या जातात व सरते शेवटी विभाग प्रमुखाकडून मंजुरी घेऊन कार्यरंभ होतो. ही प्रक्रीया किचकट असल्याने मंजुरीला विलंब होत आहे. यंदाच्या वर्षाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी १५ एप्रिलची डेडलाईन आहे. आॅनलाईनद्वारे प्रस्तावंचा ओघ वाढत आहे. नियोजनाचा अभावयोजनेच्या सुरवातीपासून आॅनलाईन अर्जाची छाणनी, त्याची नोंद जिल्हा कृषी कार्यालयाकडे होणे गरजेचे होते. तालुकानिहाय किती अर्ज दाखल होत असताना त्याची नोंदही कार्यालयात नव्हती. त्यामुळे अंतिम प्रक्रीयेत गोंधळ उडाला आहे. प्राधान्य कुणाला द्यावेआॅनलाईनद्वारे अर्ज स्वीकरण्यास २९ फेब्रुवरीला सुरवात झाली. वेबसाईटमध्ये सातत्याने अडथळा निर्माण होत असल्याने पहिला मान कुणाला द्यावा हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत आहे. खातरजमा करून घेण्यासाठी एकाच शेतकऱ्याने दोन-दोन वेळा अर्ज भरला आहे. त्यामुळे प्रस्तावांचा आकडा फुगला असला तरी छाणनीमध्ये अधिकाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. जनजागृतीचा आभावसध्याची दुष्काळी परिस्थितीमुळे प्रशासकीय स्तरावर मागेल त्याला शेततळे योजनेला अन्यनसाधारण महत्व होते. त्यानुसार जनजागृती करण्याच्या सुचना वेळोवेळी देण्यात येत होत्या. पोस्टरबाजी, योजनेची माहिती, गावस्तरावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. काही तालुके वगळता शेतकऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांचीही योजनेबाबत उदासिनता होती.