शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणावर पसरले दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 21, 2014 01:19 IST

नळणी : ग्रामीण भागात अद्यापही अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून,

नळणी : ग्रामीण भागात अद्यापही अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अद्यापही बैलांसाठी लागणारे साज, सुताच्या दोरीची खरेदी झालेली नाही. त्यामुळे पोळा कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहे.नळणी व परिसरात भर पावसाळ्यात आलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. तसेच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, मिरची लागवड केली. परंतु त्यावरही किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यातही उत्पादनाची घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पाऊसच नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच शेतकऱ्याचां मोठा सण म्हणून पोळ्याला महत्त्व आहे. त्यामळे बैलांसाठी शहरात जावून घागरमाळ, बाशिंग, झाल आणतात परंतु यंदा सुताचे भाव वाढल्यामुळे शेतकरी बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. पोळा सण हा आठ दिवसांवर आला आहे. तरी बाजारपेठेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूणच पोळा सणावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे.दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पोळासणासाइी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तूत थोडीफार वाढ झालेली आहे. मात्र आधिच दुष्काळ असल्याने शेतकरी फारसे साहित्य खरेदी करताना दिसून येत नाही.पावसाची प्रतीक्षाचजालना जिल्ह्यातमागील तीन वर्षापासून निर्सगाच्या लहरीपणाचा सामना शेतकरी करीत आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. यामुळे शेतकरी धास्तावला आहे.जालना जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला होता. १२ आॅगस्टअखेर वार्षिक टक्केवारीच्या ७३. ३३ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी मात्र आज पर्यंत केवळ १७.५९ टक्के पाऊस झालेला आहे. म्हणजे मागील वर्षापेक्षा चार पटीने कमी पाऊस झालेला आहे. जिल्हा भरातील शेतकरी अद्यापही पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. (वार्ताहर)