शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीत प्रशासकीय कार्यालयांचाही वाटा

By admin | Updated: May 12, 2015 00:52 IST

राजेश खराडे , बीड परिमंडळात सर्वाधिक थकबाकी बीड मंडळाकडे आहे. दुष्काळी परिस्थितीचे निमित्त करून ग्रामीण भागातील वसुलीला ब्रेक बसला आहे

राजेश खराडे , बीडपरिमंडळात सर्वाधिक थकबाकी बीड मंडळाकडे आहे. दुष्काळी परिस्थितीचे निमित्त करून ग्रामीण भागातील वसुलीला ब्रेक बसला आहे तर प्रशासकीय कार्यालयांच्या उदासिनतेमुळे एकूण थकबाकीचा जवळपास निम्मा भार प्रशासकीय कार्यालयांनी उचलला आहे.जिल्ह्यातील नगरपालिका व पाणीपुरवठा विभागाकडे ३३०७ कनेक्शनच्या बदल्यात महावितरणची तब्बल १४५ कोटी ५८ लाख २२ हजार ऐवढी थकबाकी आहे. मार्च महिन्यात महावितरणकडून विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही ग्रामीण भागातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरण ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहचले होते. मात्र ग्रामीण भागातूनही वसुली होत असताना पाणीपुरवठा विभाग व नगरपालिकेच्या पथदिव्यांकडील वसुलीकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे. या दोन्ही विभागाची अधिक थकबाकी असूनही महावितरणकडून केवळ नोटीसाशिवाय अन्य कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. वसुली मोहिमेदरम्यान घरगुती, व्यापारी, औद्योगिक वर्गाकडून सरासरीइतकी वसुली झाली आहे. असे असतानाही गेल्या महिनाभरापासून विद्युत पुरवठा दुरूस्ती कामामुळे विस्कळीत झाला आहे. एकीकडे वीज बिलांचा भरणा करूनही ग्राहकांना सुरळीत सेवा भेटत नाही तर दुसरकीडे प्रशासकिय कार्यालयांकडून ‘पुढचे पाठ अन् मागचे सपाट’ असे सुरू आहे. केवळ चालू बिले भरली जात आहेत. त्यांना सेवा मात्र अखंडीत आहे. बीड नगरपालिकेला महिन्याकाठी ७ ते ८ लाख रुपयांचे बिल येते तर थकबाकी १२० कोटींच्या घरात आहे. नगरपालिकेकडून केवळ महिन्याचे बिल अदा केले जात आहे. १२० कोटींच्या थकबाकीकडे महावितरणचेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे बीड नगरपालिकेकडे सर्वाधिक १६ कोटी ४० लाखाची थकबाकी आहे.शहरातील पथदिव्यांची संख्या २२६ एवढीच आहे. शहरातील शाहू नगर, अंबिका चौक, स्वराज्यनगर, पंचशीलनगर आदी भागातील पथदिव्यांचे डायरेक्ट कनेक्शन करण्यात आल्यानेच दिवसाही पथदिवे हे सुरूच राहत आहे.महावितरणकडून विद्युत खांबावरील टायमर स्वीच खराब असल्याचा बोलबाला केला जात आहे. पथदिवे वापरत असलेल्या विजेचे मुल्य सामान्यांच्या बीलात समावेश केले जाते. अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या खिशातूनच महावितरण वसुली करीत आहे. नगरपालिकेचे पथदिवे आणि पाणीपुरवठा विभागातून सर्वसामान्य नागरिकांना होणारा पाणीपुरवठा हे दोन्हीही विभाग प्रत्यक्ष जनतेशी जोडले गेले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत केल्यास सर्वसामान्य नागरिकांची अडचण होणार आहे. नगर पालिकेला वेळोवेळी थकबाकीसंदर्भात नोटिसा दिल्या असल्याचे जिल्हा अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.