शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

शहरात उष्णतेचा तडाखा आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचारोगात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 18:38 IST

वाढती उष्णता आणि त्याला कचरा जाळल्यामुळे मिळालेली प्रदूषित हवेची जोड यामुळे सध्या त्वचारोगांचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देकचरा जाळल्यामुळे शहराच्या प्रदूषणाच्या पातळीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ उन्हाचा तडाखा आणि त्यात प्रदूषित हवेची पडलेली भर यामुळे त्वचाविषयक आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

औरंगाबाद : वैशाखातील वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल, टोपी, स्कार्फ, गॉगल या साधनांचा वापर केला तरी तो अपुरा ठरतो. वाढती उष्णता आणि त्याला कचरा जाळल्यामुळे मिळालेली प्रदूषित हवेची जोड यामुळे सध्या त्वचारोगांचे प्रमाण वाढले आहे.

कचरा जाळल्यामुळे शहराच्या प्रदूषणाच्या पातळीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने एप्रिल अखेरीस प्रकाशित केले होते. प्रदूषित हवेचे दुष्परिणाम सध्या सामान्य लोकांना भोगावे लागत असल्याचे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले.उन्हाळ्यात हवा कोरडी झालेली असते. यामुळे या दिवसांमध्ये धुळीचे प्रमाण वाढते. यासोबतच शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे मध्यंतरी कचरा जाळण्याचे प्रमाणही वाढले होते. या कचऱ्यात प्लास्टिक, रबर यांसारखे हानिकारक पदार्थही असतात. साध्या कचऱ्यासोबत हे पदार्थ जळाल्यामुळे हवेत सल्फर, डायआॅक्सिजन यासारखे आरोग्यावर दुष्परिणाम करणारे घटक हवेत मिसळत आहेत.

त्यामुळे आधीच उन्हाचा तडाखा आणि त्यात प्रदूषित हवेची पडलेली भर यामुळे त्वचाविषयक आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे हवा कोरडी होते. त्वचेचे हायड्रेशन सुरळीतपणे होत नाही. यामुळे त्वचा शुष्क होते, अशी शुष्क त्वचा तीव्र उन्हाच्या माऱ्यामुळे करपते यालाच वैद्यकीय भाषेत सनबर्न म्हणतात. यामध्ये त्वचा पूर्णपणे काळी पडते आणि या भागाला खाज येते. हे टाळण्यासाठी शक्यतो उन्हात फिरू नये. 

प्रदूषणच जबाबदारसनबर्नच्या रुग्णांसोबतच अंगावर पुरळ, पिवळसर असलेले मोठे फोड, मोठ्या आकाराचे लालसर फोड अशा त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या समस्येसाठी सर्वतोपरी हवेमध्ये असणारे प्रदूषणच जबाबदार आहे. कचरा जाळण्याचे परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. कचरा जाळताना कचऱ्यातील घातक पदार्थांचा स्फोट होऊन चेहरा, हात-पाय जळाल्यामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही सध्या वाढले आहे, अशी माहिती डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी दिली. 

टॅग्स :Healthआरोग्यpollutionप्रदूषणGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर