शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

शहरात उष्णतेचा तडाखा आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचारोगात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 18:38 IST

वाढती उष्णता आणि त्याला कचरा जाळल्यामुळे मिळालेली प्रदूषित हवेची जोड यामुळे सध्या त्वचारोगांचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देकचरा जाळल्यामुळे शहराच्या प्रदूषणाच्या पातळीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ उन्हाचा तडाखा आणि त्यात प्रदूषित हवेची पडलेली भर यामुळे त्वचाविषयक आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

औरंगाबाद : वैशाखातील वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल, टोपी, स्कार्फ, गॉगल या साधनांचा वापर केला तरी तो अपुरा ठरतो. वाढती उष्णता आणि त्याला कचरा जाळल्यामुळे मिळालेली प्रदूषित हवेची जोड यामुळे सध्या त्वचारोगांचे प्रमाण वाढले आहे.

कचरा जाळल्यामुळे शहराच्या प्रदूषणाच्या पातळीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने एप्रिल अखेरीस प्रकाशित केले होते. प्रदूषित हवेचे दुष्परिणाम सध्या सामान्य लोकांना भोगावे लागत असल्याचे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले.उन्हाळ्यात हवा कोरडी झालेली असते. यामुळे या दिवसांमध्ये धुळीचे प्रमाण वाढते. यासोबतच शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे मध्यंतरी कचरा जाळण्याचे प्रमाणही वाढले होते. या कचऱ्यात प्लास्टिक, रबर यांसारखे हानिकारक पदार्थही असतात. साध्या कचऱ्यासोबत हे पदार्थ जळाल्यामुळे हवेत सल्फर, डायआॅक्सिजन यासारखे आरोग्यावर दुष्परिणाम करणारे घटक हवेत मिसळत आहेत.

त्यामुळे आधीच उन्हाचा तडाखा आणि त्यात प्रदूषित हवेची पडलेली भर यामुळे त्वचाविषयक आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे हवा कोरडी होते. त्वचेचे हायड्रेशन सुरळीतपणे होत नाही. यामुळे त्वचा शुष्क होते, अशी शुष्क त्वचा तीव्र उन्हाच्या माऱ्यामुळे करपते यालाच वैद्यकीय भाषेत सनबर्न म्हणतात. यामध्ये त्वचा पूर्णपणे काळी पडते आणि या भागाला खाज येते. हे टाळण्यासाठी शक्यतो उन्हात फिरू नये. 

प्रदूषणच जबाबदारसनबर्नच्या रुग्णांसोबतच अंगावर पुरळ, पिवळसर असलेले मोठे फोड, मोठ्या आकाराचे लालसर फोड अशा त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या समस्येसाठी सर्वतोपरी हवेमध्ये असणारे प्रदूषणच जबाबदार आहे. कचरा जाळण्याचे परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. कचरा जाळताना कचऱ्यातील घातक पदार्थांचा स्फोट होऊन चेहरा, हात-पाय जळाल्यामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही सध्या वाढले आहे, अशी माहिती डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी दिली. 

टॅग्स :Healthआरोग्यpollutionप्रदूषणGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर