शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Drought In Marathwada : कपाशी भुईसपाट, मकाही वाळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 17:17 IST

रोजगारासाठी तरुणांचे शहरात दररोज अपडाऊन, शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. ही काळीज भेदणारी विदारक स्थिती आहे कन्नड तालुक्यातील कानडगाव (क.) गावची.

- सुरेश चव्हाण, कानडगाव (क.), ता. कन्नड, जि. औरंगाबाद

दुबार पेरणी करूनही पीक हातात नाही. कपाशी भुईसपाट झाली, तीन महिन्यांत कपाशीची उंची दीड फूट, मका वाळला. रबीही धोक्यात. चारा नसल्याने पशुधन विकण्याची वेळ. रोजगारासाठी तरुणांचे शहरात दररोज अपडाऊन, शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. ही काळीज भेदणारी विदारक स्थिती आहे कन्नड तालुक्यातील कानडगाव (क.) गावची.

चापानेर महसूल मंडळात कन्नड आणि वैजापूर तालुक्यांच्या सीमेवरील हे गाव. शिवारातील जमीन कोरडवाहू त्यामुळे पावसावरच शेती अवलंबून आहे. यावर्षी सुरुवातीला पडलेल्या पावसावर कापूस, मका पिकाच्या लागवडीवर खर्च केला मात्र पेरणीनंतर पावसाने दोन महिने पाठ फिरविली. त्यामुळे पिके वाळून गेली. दोन महिन्यांनंतर पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, तर काहींनी पेरणीच केली नाही. ज्यांनी पेरणी केली त्यांची पिकेही उगवली. मात्र पावसाने पुन्हा तडी दिली. परिणामी कपाशीची वाढ खुंटली तर मका वाळून गेला. आता रबीची पेरणी झाली आहे. ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी झाली मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे. शेती बागायत करण्याचा प्रयत्न झाला मात्र जमिनीतील खाऱ्या पाण्याने त्याला सुरूंग लावला.

गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वैजापूर तालुक्यातील भटाणा तलावाच्या खाली नदीच्या काठावर विहीर खोदून पाणीपुरवठा योजना करण्यात आलेली आहे. मात्र, पाणी नसल्याने सुमारे एक वर्षापासून ही योजना बंदच आहे. गावातील बोअर अधिग्रहण करण्यात आलेला असून त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरूआहे. मात्र दोन महिन्यांपर्यंतच पाणी पुरेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. खरीप हंगामातील मका, बाजरी या पिकांमुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे सहज शक्य होते; परंतु यावर्षी पाऊस न पडल्यामुळे ही पिके आलीच नाहीत. शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे अशक्य झाल्याने दारासमोर लक्ष्मीचे उपासमारीने होणारे हाल शेतकऱ्यांना असह्य होत आहेत. त्यामुळे शेतकरी लाखमोलाचे पशुधन कवडीमोल भावात विक्री करू लागले आहेत.

उत्पन्नात ६० टक्के घटकन्नड तालुक्यात कापूस आणि मका ही प्रमुख पिके घेतली जातात. जुलै ते आॅगस्ट या कालावधीत २५ ते ३५ व आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत ३० ते ३५ दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे कापूस पिकाच्या उत्पन्नात ३५ ते ४० टक्के, तर मका आणि बाजरी पिकाच्या उत्पन्नात ६० ते ६५ टक्के घट येईल.-एस.एम.पेंडभाजे, तालुका कृषी अधिकारी, कन्नड

बळीराजा काय म्हणतो?- माझ्याकडे ३ एकर शेती आहे. दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी, दरवर्षी येणारा अवेळी पाऊस नवीन निर्णय घ्यायला भाग पाडतो. यावर्षी तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. घर कसे चालवायचे, शासनाने दुष्काळ जाहीर करावा. -संजय साहेबराव नलावडे  

- पावसाच्या लहरीपणापुढे शेतकरी हतबल झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील तरुण कामासाठी औरंगाबाद येथे अप-डाऊन करीत आहेत. गावात मग्रारोहयोची कामे सुरु करावी. -अप्पासाहेब नलावडे  

- कापूस लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी पाऊस पडला. पीक वाया गेल्याने दुबार पेरणी करुन मका लावला. मका लागवडीनंतर दीड महिना पाऊस न पडल्याने मकाही वाळून गेला. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण, दवाखाना, घरखर्च कसा भागवावा, चारा नसल्याने जनावरे कशी सांभाळावी, हीच चिंता झोपू देत नाही. -कैलास रामचंद्र नलावडे  

- पेरणी वाया गेल्याने हातचेही गेले. आता काय करावे याची चिंता आहे. चारा छावणी सुरु झाली तरच जनावरे जगतील. -बालिका गोकुळ नलावडे  

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी