शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

Drought In Marathwada : कपाशी भुईसपाट, मकाही वाळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 17:17 IST

रोजगारासाठी तरुणांचे शहरात दररोज अपडाऊन, शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. ही काळीज भेदणारी विदारक स्थिती आहे कन्नड तालुक्यातील कानडगाव (क.) गावची.

- सुरेश चव्हाण, कानडगाव (क.), ता. कन्नड, जि. औरंगाबाद

दुबार पेरणी करूनही पीक हातात नाही. कपाशी भुईसपाट झाली, तीन महिन्यांत कपाशीची उंची दीड फूट, मका वाळला. रबीही धोक्यात. चारा नसल्याने पशुधन विकण्याची वेळ. रोजगारासाठी तरुणांचे शहरात दररोज अपडाऊन, शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. ही काळीज भेदणारी विदारक स्थिती आहे कन्नड तालुक्यातील कानडगाव (क.) गावची.

चापानेर महसूल मंडळात कन्नड आणि वैजापूर तालुक्यांच्या सीमेवरील हे गाव. शिवारातील जमीन कोरडवाहू त्यामुळे पावसावरच शेती अवलंबून आहे. यावर्षी सुरुवातीला पडलेल्या पावसावर कापूस, मका पिकाच्या लागवडीवर खर्च केला मात्र पेरणीनंतर पावसाने दोन महिने पाठ फिरविली. त्यामुळे पिके वाळून गेली. दोन महिन्यांनंतर पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, तर काहींनी पेरणीच केली नाही. ज्यांनी पेरणी केली त्यांची पिकेही उगवली. मात्र पावसाने पुन्हा तडी दिली. परिणामी कपाशीची वाढ खुंटली तर मका वाळून गेला. आता रबीची पेरणी झाली आहे. ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी झाली मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे. शेती बागायत करण्याचा प्रयत्न झाला मात्र जमिनीतील खाऱ्या पाण्याने त्याला सुरूंग लावला.

गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वैजापूर तालुक्यातील भटाणा तलावाच्या खाली नदीच्या काठावर विहीर खोदून पाणीपुरवठा योजना करण्यात आलेली आहे. मात्र, पाणी नसल्याने सुमारे एक वर्षापासून ही योजना बंदच आहे. गावातील बोअर अधिग्रहण करण्यात आलेला असून त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरूआहे. मात्र दोन महिन्यांपर्यंतच पाणी पुरेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. खरीप हंगामातील मका, बाजरी या पिकांमुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे सहज शक्य होते; परंतु यावर्षी पाऊस न पडल्यामुळे ही पिके आलीच नाहीत. शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे अशक्य झाल्याने दारासमोर लक्ष्मीचे उपासमारीने होणारे हाल शेतकऱ्यांना असह्य होत आहेत. त्यामुळे शेतकरी लाखमोलाचे पशुधन कवडीमोल भावात विक्री करू लागले आहेत.

उत्पन्नात ६० टक्के घटकन्नड तालुक्यात कापूस आणि मका ही प्रमुख पिके घेतली जातात. जुलै ते आॅगस्ट या कालावधीत २५ ते ३५ व आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत ३० ते ३५ दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे कापूस पिकाच्या उत्पन्नात ३५ ते ४० टक्के, तर मका आणि बाजरी पिकाच्या उत्पन्नात ६० ते ६५ टक्के घट येईल.-एस.एम.पेंडभाजे, तालुका कृषी अधिकारी, कन्नड

बळीराजा काय म्हणतो?- माझ्याकडे ३ एकर शेती आहे. दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी, दरवर्षी येणारा अवेळी पाऊस नवीन निर्णय घ्यायला भाग पाडतो. यावर्षी तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. घर कसे चालवायचे, शासनाने दुष्काळ जाहीर करावा. -संजय साहेबराव नलावडे  

- पावसाच्या लहरीपणापुढे शेतकरी हतबल झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील तरुण कामासाठी औरंगाबाद येथे अप-डाऊन करीत आहेत. गावात मग्रारोहयोची कामे सुरु करावी. -अप्पासाहेब नलावडे  

- कापूस लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी पाऊस पडला. पीक वाया गेल्याने दुबार पेरणी करुन मका लावला. मका लागवडीनंतर दीड महिना पाऊस न पडल्याने मकाही वाळून गेला. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण, दवाखाना, घरखर्च कसा भागवावा, चारा नसल्याने जनावरे कशी सांभाळावी, हीच चिंता झोपू देत नाही. -कैलास रामचंद्र नलावडे  

- पेरणी वाया गेल्याने हातचेही गेले. आता काय करावे याची चिंता आहे. चारा छावणी सुरु झाली तरच जनावरे जगतील. -बालिका गोकुळ नलावडे  

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी