शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून दुबार पंचनाम्याची मागणी

By admin | Updated: May 10, 2014 23:51 IST

बीड: गारपिटीतील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तयारी शासनाने दाखवली़ मात्र शासन निकषामुळे शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित रहावे लागले आहे़

बीड: जिल्ह्यात मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीतील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तयारी शासनाने दाखवली़ मात्र शासन निकषामुळे निम्म्यापेक्षा जास्त शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित रहावे लागले आहे़ एवढेच काय तर एकट्या पाटोदा तालुक्यातून दोन हजार शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे दुबार पंचनामे करण्याची मागणी केली आहे. गारपिटीत चाळीस टक्के नुकसान झाले काय? अन् पन्नास टक्के झाले काय? शेवटी आमच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे, अशा प्रतिक्रिया गारपीटग्रस्त शेतकर्‍यांमधून येत आहेत. एकट्या पाटोदा तालुक्यातून दुबार पंचनाम्यासाठी दोन हजार अर्ज आले आहेत़ राज्यासह बीड जिल्ह्यात मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीसह वादळ वार्‍यांमुळे शेतकर्‍यांच्या रबी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे, त्यांनाच दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचा मोबदला मिळणार आहे. या शासन धोरणामुळे शेतकरी उध्द्वस्त झाला आहे. एकट्या पाटोदा तालुक्यातून शनिवारपर्यंत दोन हजार शेतकर्‍यांनी तहसिल कार्यालयाला निवेदन देऊन गारपिटीत झालेल्या नुकसानीचे दुबार पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे. पंचनाम्यांची तपासणी करणार जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी दुबार पंचनाम्याची मागणी केलेली आहे. यावरून सर्वप्रथम तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यांची तपासणी करण्यात येईल. याबरोबरच मी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पहाणी करणार आहे. शेतकर्‍यांनी केलेल्या मागणीवर तोडगा काढण्यात येईल असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. निकष चुकीचेच आस्मानी संकटांमुळे शेतकर्‍यांच्या तोंडाचा घास हिरावला गेला आहे. गारपीटीत जरी चाळीस टक्के नुकसान झालेले असले तरी काळ्या पडलेल्या ज्वारी अथवा गव्हाला कोण घेणार? असा सवाल बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील सरपंच अंकुश गोरे यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)