शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांना उतरती कळा

By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST

विजय चोरडिया, जिंतूर महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या बचत गट चळवळीला जिंतूर तालुक्यात अखेरची घरघर लागली आहे.

विजय चोरडिया, जिंतूर
महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या बचत गट चळवळीला जिंतूर तालुक्यात अखेरची घरघर लागली आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील ५०० पेक्षा जास्त गट बंद पडले आहेत. याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात ६७५ बचत गट आहेत. त्यापैकी ११४ गट अनियमित असून १९० गट बंद पडले आहेत. हा आकडा शासकीय असला तरी बंद पडलेल्या गटांची संख्या ३५० च्या घरात आहे. २७१ चालू गटापैकी १७० गटांना विविध बँकांनी वित्त पुरवठा केला आहे. १७० पैकी १५० बचत गट सक्षम असून वेगवेगळ्या उपक्रमातून आपली आर्थिक उन्नती ते करीत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने मागील चार ते पाच वर्षापासून बचत गट चळवळ जोमाने सुरू आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून या चळवळीला फारसे वित्तीय सहाय्य बँकांकडून मिळत नाही. म्हणूनच की, काय? अनेक बचत गट नावालाच उरले आहेत.
शहरी भागामध्ये १११ बचत गटांची नगरपालिकेकडे नोंदणी आहे. त्यापैकी ७५ बचत गट चालू असून साधारणत: ३० ते ३५ बचत गट बंद अवस्थेत आहेत. सध्या कार्यरत असणाऱ्या बचत गटांपैकी ५२ बचत गटांना वित्तीय संस्थांनी कर्ज पुरवठा केला आहे. यापैकी २० ते २५ बचत गट सक्षमपणे शहरी भागामध्ये कार्यरत आहेत.
शहरी भागामध्येही बचत गटांची संख्या फुगलेली दिसत आहे. प्रत्यक्षात बचत गटाला ज्या पद्धतीने चालना मिळायला हवी तशी मिळत नाही. परिणामी अनेक बचत गट बंद अवस्थेत आहेत.
बचत गट चळवळ सक्षमपणे चालली तर महिलांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होता येईल, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच बँकांनी सक्षम बचत गटाला विना प्रयास तात्काळ आर्थिक मदत केल्यास महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने साध्य होईल, असे वाटते.