शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नवमतदार ठरणार निर्णायक घटक

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

जालना : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली असून त्यात बहुतांश युवा मतदार असल्याने

जालना : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली असून त्यात बहुतांश युवा मतदार असल्याने या निवडणुकीत नवमतदारांचा टक्का निर्णायक ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत नवमतदारांचा मोठा बोलबाला सुरु आहे. विशेषत: हा मतदार कमालीचा जागरुक झाला असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर पुढाऱ्यांनी या नव्या मतदारांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच त्या-त्या मतदारसंघात नवमतदारांना आकर्षिक करण्याकरिता मातब्बर पुढारी ऐनकेन प्रकारे प्रयत्न करीत आहेत. विशेषत: नवमतदारांना त्या-त्या कार्यक्षेत्रात दरवर्षी करिअर गाईडन्स, नोकरी महोत्सव, स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य वगैरेचे आमिष दाखविले जात आहे. या विधानसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत एकूण १४ लाख ९५ हजार ३६९ मतदार होते. निवडणूक विभागाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ३१ जानेवारी २०१४ पर्यंत १ लाख ६ हजार १०३ नवमतदारांनी नोंदणी केली. तसेच मार्च महिन्यात एक दिवसीय नोंदणी अभियान राबविण्यात आले. यातही २९ हजार ५६५ मतदारांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी केली. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील मतदारांच्या संख्येत १ लाख ३५ हजार ६६८ ने वाढ झाली. यात ७३ हजार १९२ पुरूष तर ६२ हजार ४७६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक मतदार वाढले. व या नवमतदार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. या विधानसभेतही नवमतदार उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेईल, असा अंंदाज आहे. यंदाच्या निवडणुकीला युवा वर्गामध्ये मोठे व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. यावर्षी युवकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. फेसबुक, व्हॉट्स-अप या सोशल नेटवर्किंग माध्यमांसह टीव्ही वरील जाहिरातींमुळे मतदारांमध्ये मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसत आहे. जालना शहरातील विविध सामाजिक संघटनाही मतदानाच्या जागृतीविषयी सरसावल्या आहेत. निवडणूक विभागाच्या वतीनेही शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पथनाट्य, मोबाईल व्हॅन, संकल्प पत्र भरून घेणे या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविण्याचे उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढणार आहे, हे निश्चित. (प्रतिनिधी)