शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
4
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
5
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
6
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
7
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
8
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
9
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
10
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
11
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
12
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
13
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
14
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
15
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
16
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
17
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
18
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
19
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
20
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मोती तलाव ठरतोय ‘डेथ स्पॉट’

By admin | Published: January 17, 2017 11:07 PM

ज्ाालना : मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

ज्ाालना : एमआयडीसी परिसरातील कैलास शटर येथील चंद्रकांत पाईकराव (४५) यांनी मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, शहरातील जुन्या जालना परिसरात असलेल्या या मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती परिसरात व्यक्त होऊ लागली आहे. मोतीबाग हे नगरपालिकेचे शहरातील एकमेव मोठे उद्यान आहे. उद्यानाच्या पाठिमागे निसर्गरम्य असा मोती तलाव आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पावसाचे पाणी साठून रहावे यासाठी नगरपलिकेने यंदा या तलावातील गाळही काढला आहे. त्यामुळे तलावाची खोली वाढून तलावात मुबलक पाणीासाठा झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या बोअरची पाणीपातळी वाढली आहे. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टीने या तलावाच्या कडेला कसलेही संरक्षण नसल्यामुळे हा तलाव जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दीड महिन्यात तिघांनी या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यात यशवंतनगर येथील तरूण मयूर वाघ, एका महिला आणि मंगळवारी चंद्रकांत पाईकराव यांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षात या तलावामध्ये ४० जणांनी आत्महत्या केली असल्याची माहिती परिसरातील दुकानदार सांगत आहेत. सरक्षण भींत नसल्याने सहज तलावात उडी घेता येत असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, मयुर वाघ हा आत्महत्या करण्यापूर्वी या परिसरात काही काळ फिरत होता, असेही एका व्यापाऱ्याने सांगितले. त्याचे प्रेत पाण्याबाहेर काढल्यानंतर फिरत असलेलाच हा मुलगा असल्याने आपणाला धक्का बसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे तलावाला सरंक्षण भींत असणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया या भागातील रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, या घटनांना पालिका कितपत गांभिर्याने घेऊन सुरक्षिततेबाबत कार्यवाही करते, याकडे आता शहरवासियांचे लक्ष आहे.