शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कठड्यांविना पूल धोकादायक

By admin | Updated: June 15, 2015 00:11 IST

जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे असलेले पाच रस्ते वर्षानुवर्षे कठड्यांविना असून ते धोकादायक बनले आहेत. या मार्गांवर सातत्याने अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडतात.

जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे असलेले पाच रस्ते वर्षानुवर्षे कठड्यांविना असून ते धोकादायक बनले आहेत. या मार्गांवर सातत्याने अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडतात. परंतु संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.गरीबशहा बाजार ते मस्तगड या कुंडलिका नदीच्या पुलाचा रस्ता अरूंद आहे. तसेच या रस्त्यावर खड्डे पडल्याने अनेक वाहनधारक खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही भागात पुलाचे कठडे गायब असल्याने रस्ते चुकविताना वाहन घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सा.बां. विभागाने तसेच नगरपालिकेनेही लक्ष देण्याची गरज आहे.कन्हैय्यानगरजवळ सीना नदीवर असलेल्या पुलावर मागील पाच ते सहा वर्षांपासून दोन्ही बाजूंचे कठडे गायब झालेले आहेत. या पुलावरून जवळच असलेल्या गायत्रीनगर शाळेत अनेक विद्यार्थी पायी ये-जा करतात. तसेच नवीन मोंढा याच रस्त्यावर असल्याने शहरातील व्यापारी, कामगार तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. गेल्यावर्षी या पुलावर कठडे नसल्याने मारोती व्हॅन उलटून दोघेजण ठार झाले होते. लक्कडकोट ते देहेडकरवाडी रस्त्यावर चोवीस तास वाहतूक असते. मात्र या पुलावरील कठडेही मोठ्या प्रमाणात गायब झालेले आहेत. सायंकाळनंतर हा रस्ता अंधारात असतो. येथेही अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु सरकारी यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष होते. भोकरदन नाका ते औरंगाबाद रस्त्यावर रामतीर्थ स्मशानभूमीच्या पुलासमोरील छोट्या पुलाच्या रस्त्यावर देखील कठडे नाहीत. या ठिकाणी देखील अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. मोती तलावासमोरील बायपास रस्त्यावरील कठडे देखील गायब झालेले असून काही वर्षांपूर्वी या रस्त्यावरून ट्रक योगेश्वरी कॉलनीच्या मागील बाजूस पलटी झाला होता. शहरातील प्रमुख मार्गांमध्ये या पाचही रस्त्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे या रस्त्यांवर अपघातांच्या अनेक घटना घडल्या. वारंवार लक्ष वेधूनही दखल घेतली जात नाही. (प्रतिनिधी)