शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
3
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
4
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
5
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
6
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
7
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
8
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
9
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
10
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
11
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
12
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
13
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
14
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
15
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
16
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
17
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
18
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
19
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
20
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीसाठी धोक्याची घंटा

By admin | Updated: May 20, 2014 00:06 IST

हिंगोली : हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली व वसमत विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने येथील काँग्रेस व राष्टÑवादीच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

हिंगोली : हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली व वसमत विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने येथील काँग्रेस व राष्टÑवादीच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे येथील आमदारांना आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंगोली विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेसचे आ.भाऊराव पाटील गोरेगावकर करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित असताना शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना एकूण १० हजार ९३३ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीकरीता काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता कुठे चुका झाल्या, याचे आत्मपरिक्षण आ. गोरेगावकर व काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना करावे लागणार आहे. स्वत: आ.गोरेगावकर यांच्या गोरेगाव या गावात सातव यांना केवळ १ हजार ६६७ मते मिळाली. तर वानखेडे यांना २ हजार ३४६ मते मिळाली. दुसरीकडे हिंगोली विधानसभा मतदार संघातून गेल्या वेळी भाजपाकडून निवडणूक लढविलेले भाजपाचे तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांच्या आडगाव या गावातून वानखेडे यांना ४७७ मते मिळून दिली. येथे सातव यांना ३८६ मते मिळाली. त्यामुळे मुटकुळे यांनी या क्षणी तरी महायुतीच्या उमेदवारास जास्तीचे मते मिळवून देऊन आपली उमेदवारीची दावेदारी पक्की केली आहे. वसमत विधानसभा मतदार संघातही अशीच काहीशी स्थिती आहे. या मतदार संघाचे नेतृत्व गेल्या १० वर्षांपासून राष्टÑवादीचे आ.जयप्रकाश दांडेगावकर करीत आहेत. या मतदार संघातून शिवसेनेला ९ हजार ९१ मतांची आघाडी मिळाली आहे. आ. दांडेगावकर यांचे दांडेगाव हे गाव कळमनुरी विधानसभा मतदार संघात येते. या गावातून मात्र आ. सातव यांना तब्बल ८२९ मते मिळाली आहेत. तर वानखेडे यांना ३५६ मते मिळाली आहेत. असे असले तरी राजकारणात अत्यंत मुरब्बी समजल्या जाणारे आ.दांडेगावकर यांनाही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्यांचे प्राबल्य असलेल्या अनेक गावांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारास मताधिक्य मिळाले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी मात्र त्यांच्या पांगरा शिंदे या गावात वानखेडे यांना ९५९ मते मिळवून दिली. या गावात सातव यांना ८०२ मते मिळाली. डॉ. मुंदडा हेही मतांच्या राजकारणात तरबेज समजल्या जातात. त्यांनी वानखेडे यांना अधिकची मते मिळवून देऊन राष्टÑवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. कळमनुरी विधानसभा मतदार संघात मात्र राजीव सातव यांनी स्वत: कौशल्य पणाला लावीत तब्बल २० हजार ८८ मतांची आघाडी मिळविली. शिवाय त्यांच्या मसोड या गावात त्यांना तब्बल १ हजार १४ मते मिळाली. तर वानखेडे यांना केवळ ५३ मते मिळाली. याशिवाय सातव यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक गावांमध्ये जोरदार मते मिळविली. दुसरीकडे शिवसेनेचे माजी आ. गजाननराव घुगे यांनी त्यांच्या हिंगणी या गावातून वानखेडे यांना ६६७ मते मिळवून दिली. तर या गावात सातव यांना केवळ ३६५ मते मिळाली. त्यामुळे घुगे यांचीही उमेदवारीची दावेदारी पक्की मानली जात आहे. राष्टÑवादीचे माजी खा. अ‍ॅड. शिवाजीराव माने यांनी या निवडणुकीत आघाडी धर्म बाजूला ठेवून शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा जाहीर प्रचार केला. त्यांच्या कान्हेगाव या गावातून शिवसेनेला तब्बल ५५५ मते मिळाली. तर सातव यांना १३६ मते मिळाली. अ‍ॅड. माने यांनी कळमनुरी विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथून काँग्रेसकडून कोण निवडणूक लढविणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीत आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष टारफे, जि.प. सदस्य बाबा नाईक यांनी उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टिकोणातून तयारी सुरू केली आहे. दरम्यान, देशभरात ज्या पद्धतीने काँग्रेस-राष्टÑवादीविरोधात लाट आली, ही लाट कायम राहिल्यास आघाडीला अवघड जाणार आहे. विधानसभा निवडणुकीला ४ महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने हिंगोली व वसमतमध्ये काँग्रेस-राष्टÑवादीच्या आमदारांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. यासाठी आतापासून व्यूहरचना करावी लागणार आहे. तर कळमनुरीत काँग्रेसला प्रबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) राजीव सातव यांची राजकारणातील परिपक्वता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजीव सातव यांची राजकीय परिपक्वता दिसून आली. देशभर काँग्रेस आघाडी विरोधात वातावरण व नरेंद्र मोदी यांच्या लाटेत अनेक दिग्गज भुईसपाट झाले असताना सातव यांनी प्रचाराची आखलेली रणनिती त्यांची राजकारणातील परिपक्वता दाखविणारी होती. त्यांच्या या प्रचारात त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञाताई सातव यांनीही मोलाची भूमिका बजावली. महिला आघाडीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून त्यांनी बहुतांश महिला मतदारांच्या भेटी-गाठी, कॉर्नर बैठका, जाहीर सभा घेऊन सातव यांच्या मागे मोठे मताधिक्य उभे केले. तसेच कळमनुरीचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी सातव यांच्या प्रचारार्थ होणार्‍या विविध नेत्यांच्या जाहीर सभांचे चांगले नियोजन करून सभा यशस्वी केल्या. सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या जनसंपर्काची जबाबदारी विलास गोरे यांनी यशस्स्वीपणे सांभाळली. त्यामुळेच सातव यांचा विजय सुकर झाला. सेनेला मताधिक्य मिळाल्याने अस्वस्थता हिंगोली विधानसभेतून शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना १० हजार ९३३ मतांचे मताधिक्य मिळाले. आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गोरेगावात वानखेडे यांना सातव यांच्यापेक्षा ६७९ मते जास्तीची मिळाली. वसमत विधानसभा मतदार संघात शिवसेनेला ९ हजार ९१ मतांची मिळाली आघाडी. आ. जयप्रकाश दांडेगावकर यांचे वर्चस्व असलेल्या अनेक गावांमध्ये शिवसेनेला मताधिक्य. शिवसेनेचे माजी आ. गजानन घुगे व डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या गावात शिवसेनेला मताधिक्य.