शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान हेक्टरमध्ये; पंचनामे एकरात!

By admin | Updated: April 16, 2015 01:00 IST

अनिल महाजन, धारुर तालुक्यात वादळी - वाऱ्याच्या तडाख्याने फळबागा उद्धवस्थ झाल्या. नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये असताना प्रशासनाने मात्र, केवळ १७८ एकरवरील पिकांना बाधा पोहोचल्याचा जावईशोध लावला आहे

अनिल महाजन, धारुरतालुक्यात वादळी - वाऱ्याच्या तडाख्याने फळबागा उद्धवस्थ झाल्या. नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये असताना प्रशासनाने मात्र, केवळ १७८ एकरवरील पिकांना बाधा पोहोचल्याचा जावईशोध लावला आहे. त्यामुळे कमालीचे आश्चर्य होत असून फेरपंचनाम्याची मागणी पुढे आली आहे.सलग पाच दिवस अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले. खरीप, रबी पिके वाया गेल्यामुळे आधीच शेतकऱ्यांचे गणित बिघडून गेले होते. पाणीटंचाईवर मात करत हजारो रुपये खर्च करुन काही शेतकऱ्यांनी कशाबशा फळबागा जोपासल्या. पिकेही चांगली आली;पण ऐन काढणीच्या वेळीच निसर्गाने वक्रदृष्टी फिरवली. त्यामुळे होत्याचे नव्हते झाले. सुकळी, देवठाणा, महातारगाव, मुंंगी, वाका या गावांतील टरबूज, खरबुजांचे पिक वाया गेले. मुंगी येथील शेतकरी अशोक सोळंके यांचे दोन एरवरील टरबूज वाया गेले. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला. अशीच आपत्ती इतर शेतकऱ्यांवरही ओढावली. गारांचा मारा इतका जबर होता की, टरबूज, खरबुजांचे जागेवरच दोन तुकडे पडले. शिवाय मका, ऊस, भेंडी या पिकांचेही मोठे नुकसान झाले.दरम्यान, प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले;परंतु केवळ १७८ एकरवर नुकसान झाल्याचा अहवाल दिल्याने पंचनाम्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तालुक्यात ६३२ हेक्टरवर फळबाग लाडवड आहे. मात्र, ७१ हेक्टरवरच नुकसान झाल्याचे दाखविल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप होऊ लागला आहे. विशेष म्हणजे तालुक्यात आंब्याचे उत्पादनही मोठे आहे. यंदा गारपिटीने कैऱ्या झडल्या. त्यामुळे आंबा उत्पादन करणाऱ्या तालुक्यालाच इतर ठिकाणच्या आंब्यांवर समाधान मानावे लागणार आहे.देशमुख यांचा बांधावरुन दौराआ. आर. टी. देशमुख यांनी नुकसानीच्या पाहणीसाठी नुकताच दौरा केला. काटेवाडी येथे केळीच्या बागा गारपिटीने भूईसपाट झाल्या. मात्र, देशमुख तेथे फिरकलेही नाही. शेजारच्या गावांमध्ये बांधावरुन त्यांनी पिकपाहणी दौरा आटोपला. त्यामुळे आ. देशमुख यांचा दौरा दिलासा देण्यासाठी होता की, देखाव्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.