शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी भरला तीस कोटींचा पीक विमा

By admin | Updated: August 3, 2014 01:16 IST

बीड : जिल्ह्यात यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. आतापर्यंत तब्बल तीन लाख शेतकऱ्यांनी तीस कोटींहून अधिक रक्कमेचा पीक विमा भरला आहे.

 बीड : जिल्ह्यात यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. आतापर्यंत तब्बल तीन लाख शेतकऱ्यांनी तीस कोटींहून अधिक रक्कमेचा पीक विमा भरला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात बीड जिल्ह्याला दुष्काळ, अवकाळी पाऊस तर कधी गारपीट यांनी तडाखा दिलेला आहे. गेल्या फेबु्रवारी व मार्च महिन्यात हातातोंडाशी आलेली गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके गारपीटीत जमिनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. यासह फळबागा व भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले. या आपत्तीत तब्बल एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामुळे कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांनी हानी झाली. जिल्ह्यात अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अनेकदा शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली जाते. मात्र, ही मदत शेतकऱ्यांना पुरेशी ठरत नाही. अशा परिस्थितीत मदत मिळावी, यासाठी शेतकरी आता पीक विमा मोठ्या प्रमाणावर भरू लागले आहेत. गेल्ह्यात गेल्यावर्षीही १ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यामुळे त्यांना शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली होती. यावर्षीही पावसाळा सुरू होऊन पेरणीनंतर पाऊसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा कल वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख हेक्टवर पेरणी झाली आहे. यामध्ये तीन लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी दोन लाख ८९ हजार ६१० शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा भरला आहे. यापोटी ३० कोटी ६० लाख ९५ हजार ६९२ रुपयांचा भरणा केला असल्याची माहिती अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक बोकाडे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखांत पीक विमा भरला आहे. पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची बॅँकांमध्ये गर्दी होत असल्याने पीक विमा भरण्याची तारीखही प्रशासनाने १६ आॅगस्टपर्यंत वाढविली आहे. (प्रतिनिधी)