शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

Coronavirus In Aurangabad : कोरोनाने लक्षणे बदली; औरंगाबादमधील नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 7:36 PM

कोरोनाने लक्षणे बदलल्यामुळेच औरंगाबादपेक्षा धुळे आणि जळगाव येथील मृत्यूदराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देनांदेड आणि औरंगाबादमधील कोरोना नेमका कुठल्या देशाशी साधर्म्य साधणारा ?जळगाव आणि धुळ्यात  लागण झालेल्या रुग्णांच्या विषाणूचे नमुने घातक

औरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असून विषाणूची लक्षणे बदलू लागली आहेत. जळगाव आणि धुळ्यात  लागण झालेल्या रुग्णांच्या विषाणूचे नमुने घातक असून औरंगाबादमधील नमुनेदेखील पुणे येथील व्हायरॉलॉजी लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोनाची लागण संपर्कातून होत आहे. त्यामुळे लागण झालेल्या रुग्णांच्या स्वॅबच्या नमुन्यांचे विश्लेषण करून ठरेल की नेमका तो विषाणू इतर राज्यांप्रमाणे उपद्रवी आहे की,  दुबई, चीन किंवा इतर देशांतील रुग्णांना झाल्यासारखा आहे. कोरोनाने लक्षणे बदलल्यामुळेच औरंगाबादपेक्षा धुळे आणि जळगाव येथील मृत्यूदराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते आहे. नांदेड आणि औरंगाबादमधील कोरोना नेमका कुठल्या देशाशी साधर्म्य साधणारा आहे, याची माहिती पुढे येण्यासाठी पुण्यातील लॅबमधून तपासणी होणे गरजेचे असल्यामुळे येथील विषाणूचे नमुने लॅबला पाठविले आहेत. कोरोनाची साधर्म्यता लक्षात आल्यानंतर उपचारासाठी आणखी पावले उचलले जातील, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले.

सुरुवातीला कोविडबाबत कमी माहिती होती. परिस्थितीतून सर्व शिकता आले आहे. एका विशिष्ट वयाच्या नागरी लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. २७६ मृत्यूचे विश्लेषण केले आहे. वय आणि इतर आजार असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. शेवटच्या टप्प्यातच रुग्ण उपचारासाठी समोर येत असल्यामुळे शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी मेडिसिन आणि आयसीयू विभागातील उपचार पद्धतीची माहिती यावेळी दिली.

तीन दिवसांत मृत्यूंचे प्रमाण जास्तपहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उपचारास संधी मिळत नाही. फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचारास प्रतिसाद मिळत नाही. १९.५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा औरंगाबादचा दर आहे. जे.जे. हॉस्पिटल आणि कस्तुरबा रुग्णालयापेक्षा अधिक स्वॅब टेस्ट येथे होत आहेत. ३५ हजार ३६७ टेस्ट आजवर केल्या असून ५ मशिन्स त्यासाठी कार्यरत असल्याचा दावा डॉ. येळीकर यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद