शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आला अन् डेंग्यू गेला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST

औरंगाबाद : औरंगाबादेत वर्ष २०१९ मध्ये डेंग्यूने अक्षरश: कहर केला होता. तब्बल ५२७ लोकांना डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूच्या ...

औरंगाबाद : औरंगाबादेत वर्ष २०१९ मध्ये डेंग्यूने अक्षरश: कहर केला होता. तब्बल ५२७ लोकांना डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूच्या संकटातून बाहेर पडत नाही तोच २०२० मध्ये महाभयंकर कोरोनाचा विळखा पडला. या कोरोनाच्या संकटात मात्र डेंग्यूचा उद्रेक गतवर्षीच जाणवलाच नाही. कोरोना आला आणि डेंग्यू गेला, अशीच परिस्थिती जिल्ह्यात पाहायला मिळाली.

पावसाळ्याला सुरुवात होताच डेंग्यू डोके वर काढत असल्याचा अनुभव गेली अनेक वर्षे पाहायला मिळाला. वर्ष २०२० मात्र त्याला काहीसे अपवाद ठरले. कारण कोरोना प्रादुर्भावात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. केवळ ४८ रुग्णांचे गतवर्षी निदान झाले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ४७९ ने रुग्णांची संख्या घटली. एडिस इजिप्ती हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

कुठल्या वर्षात किती पेशंट

२०१६- १३९

२०१७- ८२

२०१८- १५९

२०१९- ५२७

२०२०- ४८

---

डेंग्यूची लक्षणे

१) डेंग्यू एडिस इजिप्ती डासाच्या चावण्याने हा आजार होतो. डेंग्‍यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात.

२) अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्‍यामागे दुखणे, ही प्रमुख लक्षणे आहेत.

३) रक्‍तस्रावित डेंग्‍यू ताप हा डेंग्‍यू तापाची गंभीर अवस्‍था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते. त्‍याच्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात.

४) सुरुवातीच्‍या काही दिवसांत याची लक्षणे साध्‍या डेंग्‍यू तापासारखी असतात आणि क्‍वचित त्‍वचेवर पुरळ दिसून येतात.

५) रक्‍तस्रावित डेंग्‍यू तापाचे निदान अंगावरील दर्शनीय भागावर (हातपाय, चेहरा व मान) यावर आलेल्‍या पुरळांवरून केली जाते.

---

डेंग्यूचा सर्व्हे

जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला घरोघरी जाऊन डास अळींचे सर्वेक्षण करून डासांची उत्पत्ती थांबविली जाते. एकट्या डिसेंबर २०२० मध्ये जिल्ह्यात एक लाख २४ हजार ५११ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात दोन हजार ७३८ घरांतील तीन हजार २५१ भाड्यांत डास अळी आढळून आल्या. ही सर्व डास अळी नष्ट करण्यात आली. वर्षभरात १४२ डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ४८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले.