शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

निमशिक्षकांना दिलासा

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत निमशिक्षकांना नियुक्त्या देताना सेवाज्येष्ठता यादी डावलल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतरही अन्याय झालेल्या शिक्षकांना न्याय मिळाला नाही.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत निमशिक्षकांना नियुक्त्या देताना सेवाज्येष्ठता यादी डावलल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतरही अन्याय झालेल्या शिक्षकांना न्याय मिळाला नाही. अखेर सदरील गुरुजींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठामध्ये धाव घेतली असता, सेवाज्येष्ठतेनुसार निमशिक्षकांना नियुक्त्या देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून अन्याय झालेल्या गुरुजींना आता न्याय मिळणार आहे.वस्तीशाळांवरील पात्र निमशिक्षकांना सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केले होते. परंतु, जिल्हा परिषदेकडून या निमशिक्षकांना नियुक्त्या देताना नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. चक्क सेवाज्येष्ठता यादी डावलल्याचा प्रकार घडला होता. हा गोंधळ संबंधित निमशिक्षकांनी निदर्शनास आणून देवूनही त्यामध्ये दुरुस्ती झाली नाही. न्याय मिळावा यासाठी संबंधित गुरुजींनी सातत्याने आंदोलने केली. मात्र, शिक्षण खात्याकडून आश्वासने देण्यापलिकडे काहीच झाले नाही. त्यामुळे पात्र असतानाही जवळपास २३ शिक्षकांना नियुक्ती मिळू शकली नाही. दरम्यान, सदरील प्रकरणी तक्रारी वाढल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार त्रिसदस्यीय समिती गठीत करुन चौकशी करण्यात आली होती. चौकशी समितीनेही सदरील नियुक्ती प्रक्रिया सेवाज्येष्ठता यादीला बगल देवून राबविल्याचा ठपका ठेवला होता. या अहवालानुसार अन्याय झालेल्या शिक्षकांना न्याय देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. वारंवार पाठपुरावा करुनही प्रशासन दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित निमशिक्षकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाच्यावतीने म्हणणे सादर करण्यास विलंब झाल्यानंतर न्यायालयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगले फटकारले होते. त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित निमशिक्षकांच्या बाबतीत म्हणणे सादर करण्यात आले नव्हते. या सर्व प्रकरणावर न्यायालयामध्ये सुनावणी झाली असता, निमशिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घ्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ज्या निमशिक्षकांना पात्र असतानाही नियुक्ती मिळाली नाही त्यांना आता न्याय मिळणार आहे. शिक्षण विभागाकडून त्यानुसार प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. (प्रतिनिधी)