शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:43 IST

शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी सोमवारी खा. राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी सोमवारी खा. राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी येथील सातारकर महाराज सभागृहातून दुपारी १ वा. तहसीलवर धडक मोर्चा काढला. खा. राजीव सातव, आ.डॉ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी नेतृत्व केले. राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकºयांच्या मुलांना उच्चशिक्षण मोफत द्या, ६० वर्षांच्या पुढील ज्येष्ठ शेतकºयांना पेन्शन द्यवी, २४ तास वीजपुरवठा द्यावा, सोयाबीनला जाहीर केलेले प्रतिक्ंिवटल २०० रुपये अनुदान त्वरीत द्यावे, शौचालयाचे अनुदान सरसकट द्यावे अशा २० मागण्या मांडल्या. तहसीलवर या मोर्चाचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले.या मोर्चात तालुक्यातील शेतकरी, निराधार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात आ. टारफे, जिल्हाध्यक्ष बोंढारे यांच्यासह पक्षनिरीक्षक अमर खानापुरे, माजी जि.प.अध्यक्षा सरोजनी खाडे, माजी जि.प.सदस्य विनायकराव देशमुख, डॉ. रवी पाटील, भागोराव राठोड, भास्कर बेंगाळ, नगरसेवक विलास खाडे, डॉ.नीळकंठ गडदे, अशोक सरनाईक, प्रकाश वाघ, डॉ.माणिक देशमुख, श्यामराव जगताप, जि.प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते, प्रवीण पायघन, विजय ठोंबरे, विठ्ठल शिंदे, दिलीप होडबे, अजय विटकरे, श्रीरंग कायंदे, अशोकराव सानप, नीळकंठ मुंडे, शेख जुबेर, अमरदीप कदम, सतीश झुंगरे, पंडित देशमुख, शेख मुनीर आदी सहभागी झाले होते.यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले. स्थानिक स्तरावरील मागण्यांचा विचार केला जाईल. मात्र शासन स्तरावरील मागण्यांबाबत शासनाकडे निवेदन पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर, नर्सीचे ठाणेदार बालाजी येवते, फौजदार वंदना विरणर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दुपारी ३ वाजता मोर्चा व धरणे आंदोलनाची सांगता केली.