शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिनियुक्त्यांचा अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

By admin | Updated: May 8, 2014 00:35 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश दिले.

 हिंगोली : जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्त संजीवकुमार जयस्वाल यांनी बुधवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांना येथे दिले. विभागीय आयुक्त जयस्वाल बुधवारी हिंगोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या हस्ते समाधान योजनेंतर्गत विविध प्रमाणपत्रांचे व साहित्याचे वाटप करण्यात आल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेतील अनेक विभागांमध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून काही विशिष्ट अधिकारी मोक्यांच्या पदावर प्रतिनियुक्तीवर आहेत. यासंदर्भात शासनाची काय भूमिका आहे? असा सवाल आयुक्त जयस्वाल यांना केला असता त्यांनी अडचण असल्यास तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्त्या करता येतात; परंतु त्या प्रतिनियुक्त्या एका वर्षापेक्षा अधिक काळ असू नयेत, असे आदेश आहेत. तीन ते चार वर्षांपासून जिल्हा परिषदेत चुकीच्या पद्धतीने प्रतिनियुक्त्या केल्या गेल्या असतील तर याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करा, असा आदेश यावेळी आयुक्त जयस्वाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे यांना दिला. त्यामुळे आता बनसोडे या प्रकरणी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करणार की नाही? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. मिनरल वॉटर बाबत मागितला अहवाल हिंगोली शहरात शासनाची कसलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे मिनरल वॉटरचे प्लँट उभारले जात असून त्याद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याची तक्रार पत्रकारांनी केली. त्यावर आयुक्त जयस्वाल यांनी जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. तसेच गेल्या पाच ते सात वर्षांपासून शहरांसह जिल्ह्यात अनेक इमारती व रस्त्यांची कामे सुरू आहेत. याचीही तक्रार करण्यात आली असता त्याबाबतचाही अहवाल सादर करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात व जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक ती शासकीय कार्यालये सुरू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी) मोक्याच्या पदावर करण्यात आल्या प्रतिनियुक्त्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या उप कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले राजाराम चंदाले यांची वसमत येथे शाखा अभियंता पदावर नियुक्त करण्यात आली आहे; परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी जिल्हा परिषदेत नियुक्ती मिळविली आहे. जिल्हा ग्राम विकास यंत्रणेत बीआरजीएफ कक्षात उप अभियंतापदी कार्यरत असलेले डोंबे यांची ग्रामीण पाणी पुरवठा विभागात नियुक्ती आहे; परंतु त्यांनीही गेल्या अनेक महिन्यांपासून बीआरजीएफ मध्ये नियुक्ती मिळविली आहे. त्यांच्याकडे औंढा येथील बीआरजीएफच्या उप अभियंत्यांचाही पदभार आहे. हिंगोली येथील जि.प. बांधकाम विभागातील उप अभियंता कार्यालयातील शाखा अभियंता मुळे यांच्याकडे एनआरएचएम योजनेच्या अभियंत्याचा अनेक महिन्यांपासून पदभार आहे. या शिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य, समाजकल्याण, शिक्षण, कृषी आदी विभागातही मोठ्या प्रमाणात प्रतिनियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यातून पळवाट काढण्यासाठी कामाची गरज म्हणून नियुक्त्या करण्यात आले असल्याचे कारण जिल्हा परिषद प्रशासनाकडून दाखविले जात आहे; परंतु हे कारण अत्यंत तकलादु असल्याचे जाणकारांचे मत आहे.