शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई लटकली

By admin | Updated: September 11, 2014 01:06 IST

उस्मानाबाद : नुकसान भरपाई मिळावी यासाठी तडवळा येथील १०१ शेतकऱ्यांनी १ लाख ३१ हजार ६५ रुपये इतका पीक विमा हप्ता बँकेकडे भरला.

उस्मानाबाद : नुकसान भरपाई मिळावी यासाठी तडवळा येथील १०१ शेतकऱ्यांनी १ लाख ३१ हजार ६५ रुपये इतका पीक विमा हप्ता बँकेकडे भरला. मात्र बँक आणि विमा कंपनी यांच्यातील गोंधळामुळे संबंधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. वारंवार चकरा मारुनही संबंधित शेतकऱ्यांची केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे.शेती हा व्यवसाय बिनभरवशाचा मानला जातो. कधी दुष्काळामुळे तर अतिवृष्टीमुळे तर कधी रोगराईमुळे पिकांना फटका बसतो. अशा संकटातून सावरण्यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरु केली. या योजनेला शेतकऱ्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे. मागील दोन वर्षापासून जिल्हा बँक आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने २०१२-१३ मध्ये कसबे तडवळे येथील १०१ शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये पीक विमा हप्त्यापोटी १ लाख ३१ हजार ६५ रुपये इतकी रक्कम जमा केली होती. येथील शाखेकडून ही रक्कम सोलापूर येथील झोनल कार्यालयाकडे जमा केली. मात्र सदरील कार्यालयाकडून विमा कंपनीकडे सदरील प्रस्ताव पाठविण्यास विलंब झाला, असे सांगण्यात येते.दरम्यान, या दोन्ही कार्यालयातील गोंधळामुळे संबंधित प्रस्ताव विमा कंपनीला प्राप्त होण्यास विलंब झाला. त्यामुळे विमा कंपनीने १०१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव पुन्हा बँकेकडे पाठविले. त्यावर बँकेने पाठपुरावा केल्यानंतर सदरील प्रस्ताव विमा कंपनीने शासनाकडे पाठवून मार्गदर्शन मागविले. त्यावर शासनाने संबंधित शेतकऱ्यांना लाभ द्या असे निर्देश विमा कंपनीला दिले. ही प्रक्रिया होवून काही महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र संबंधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जात असला तरी केवळ आश्वासने मिळत आहेत, असे लाभार्थी शेतकरी दगडू बोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)कसबे तडवळे येथील १०१ शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेत पीक विमा हप्त्याची रक्तम जमा केली होती. सदरील प्रस्ताव विमा कंपनीकडे वेळेत पाठविण्यात आले होते. मात्र काही कारणामुळे संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब झाला आहे. याबाबत बँकेने विमा कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या १५ दिवसांमध्ये संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेल, असे महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक किरणकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.