शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटींचा पीक विमा बँकांकडे वर्ग

By admin | Updated: June 25, 2017 23:23 IST

परभणी : शेतकऱ्यांच्या विमा रकमेपोटी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१६-१७ वर्षातील खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. त्या शेतकऱ्यांच्या विमा रकमेपोटी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामात लागणाऱ्या खत, औषधी, बी-बियाणे खरेदी करण्यास वाव मिळणार आहे़ जिल्ह्यात गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता.जिल्ह्यात ५ लाख हेक्टरच्या वर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती़ परंतु, २०१६-१७ च्या खरीप हंगामात अवकाळी पाऊस झाला. तसेच नियमित पावसानेही उघडीप दिल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस इ. पिकांचे मोठे नुकसान झाले होते़ त्यामुळे तीन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर गतवर्षीच्या खरीप हंगामातही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता़ त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकाचा पीकविमा उतरविला होता़ २०१६-१७ या खरीप हंगामाच्या पीकविम्यापोटी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने जवळपास ५१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर केला आहे़ त्यापैकी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांच्या पीकविम्याची रक्कम बँकांकडे वर्ग केली आहे़ त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ ही रक्कम उपलब्ध करून दिल्यास औषधी, खत, बियाणे खरेदी करण्यास दिलासा मिळणार आहे़ शासनाने पीक कर्जासाठी अजूनही पुढाकार घेतला नाही़ त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत़ तेव्हा बँकांकडे उपलब्ध झालेली पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़