शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचा जागता पहारा

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

राजूर : गेल्या दीड महिन्यात चोरट्यांनी राजूरसह परिसरातील नागरिकांची झोप उडवली आहे.

राजूर : गेल्या दीड महिन्यात चोरट्यांनी राजूरसह परिसरातील नागरिकांची झोप उडवली आहे. कायम चोऱ्यांच्या घटना घडत असल्याने पोलिसांबरोबरच आता नागरिकांनीही रात्रभर जागता पहारा ठेवण्यास सुरूवात केली आहे. मात्र चोरट्यांकडून गावकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप एकाही चोरीचा तपास लावण्यात हसनाबाद पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.गेल्या दीड महिन्यात राजुरातून चारचाकी, दुचाकी वाहने चोरट्यांनी लंपास केली. त्यातच गेल्या शनिवारी चोरट्यांनी राजूर येथील दिनकर पुंगळे व चणेगाव शिवारातील बिटले यांच्या घरात घुसून मारहाण करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. त्यानंतर किरकोळ चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने राजूरसह परिसरातील गावातील नागरिक हवालदिल झाले आहेत. राजूर, तपोवन, चांधई एक्को, खामखेडा, चांधई ठोंबरी येथील बहुतांशी नागरिक वस्त्यावर राहतात. वस्तीवरील नागरिकांनी समुहाने रात्रीची गस्त सुरु केली आहे.राजुरात सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे कर्मचाऱ्यांसह युवकांना सोबत घेऊन रात्रीची गस्त घालीत आहेत. मात्र चोऱ्यांच्या अफवा सुटतच असल्याने जनता भयभीत झाली आहे. गावागावातील काही टवाळखोर दुसऱ्यांच्या घरावर दगडे मारून चोरटे आल्याची अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. पोलिसांनी चोरट्यांसह अफवा पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)अफवांचे पेव फुटले.. राजूर परिसरात काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. अशातच चोरटे आले, पळा.., घरावर दगडफेक करण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरट्यांसोबतच काही टवाळखोरांची दहशत ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. राजूरसह परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. राजूर परिसरातील तीस ते चाळीस गावांचे केंद्रबिंदू असल्याने मोठ व्यापारीपेठ आहे. या दृष्टीने हे बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.