शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यात आजपासून ३० तासांचे शटडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:23 IST

दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद, दुरुस्तीची कामे

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पाणीपुरवठ्यात गुरुवारपासून (दि. २० मार्च) तब्बल ३० तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊन काळात रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाच्या खाली १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरूस्ती, नक्षत्रवाडी पाणीपुरवठा केंद्रासह अन्य छोटीमोठी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन दिवस शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी दिली.

उन्हाळ्यापूर्वी महापालिकेला शटडाऊन घ्यायचे होते. मात्र अधूनमधून तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला होता. मागील आठवड्यात रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली तिरुपती सोसायटीजवळ नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गंत ११०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत होती. कंपनीकडून मनपाच्या १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागला. त्यामुळे थोडे लिकेज सुरू झाले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गळती पाहून पळ काढला. मनपा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी करून शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला.

सकाळी ११ वाजता पाणी बंदगुरुवारी सकाळी ११ वाजता शहराचा पाणीपुरवठा जायकवाडी धरणातून बंद करण्यात येईल. त्यानंतर लगेच रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली दुरुस्तीचे काम सुरू होईल. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर एमबीआरमध्येही काम करायचे आहे. या शिवाय फारोळा, जायकवाडी आणि अन्य ठिकाणी लहान-मोठ्या लिकेजची, विद्युत विभागाची दुरूस्ती करण्यात येईल.

शुक्रवारपर्यंत चालतील कामेशुक्रवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू राहणार आहेत. त्यानंतर जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याचे काम सुरू राहील. शुक्रवारी रात्री सर्व जलकुंभ भरून घेऊन शनिवारी सकाळी शहराला पाणी देण्याचे काम सुरू होईल, असे फालक यांनी सांगितले.

पाण्याचे टप्पे दोन दिवसानंतरगुरुवार, शुक्रवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते. त्यांना थेट शनिवारी पाणी मिळेल. शनिवारनंतरचे सर्व पाण्याचे टप्पे दोन दिवस पुढे ढकलण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी