शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

कडब्यापेक्षा ज्वारी स्वस्त

By admin | Updated: April 20, 2015 00:36 IST

राजेश खराडे , बीड यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे

राजेश खराडे , बीडयंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे. तर कडबा २५०० रुपये शेकड्यावर जाऊन पोहचलाय.सध्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेला बळीराजा खळ्यावरील ज्वारी लगेच आडतीवर घालीत असल्याने गेल्या पंधरवाड्यात ज्वारीची आवक तिपटीने वाढली आहे. परिणामी आवक वाढल्याने ज्वारीच्या दराची घसरण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीपाबरोबर रब्बी हे दोन्ही हंगाम गेले. उत्पन्नातून उत्पादनावर केलेला खर्चही निघाला नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी या प्रमुख पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. एक ना अनेक समस्यांचा सामना करीत शेवटी ज्वारीचे अल्पशा प्रमाणात का होईना उत्पादन झाले आहे. एकरी ८ पोत्याचा उतारा ३ पोत्यावरच येऊन ठेपल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेती व्यवसायातून बळीराजाला आर्थिक फटकाच अधिक प्रमाणात बसला आहे. सध्या लग्नसराई व दरडोईच्या खर्चापोटी शेतकरी शेतीमाल डायरेक्ट बाजारपेठेत आणून विक्री करीत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील सर्वच पिकांची आवक वाढली आहे. जानेवारी महिन्यात ज्वारीच्या केवळ ४ ते ५ पोत्याची आवक होत होती. उत्पादन हाती लागताच येथील बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून ज्वारीची ३०० ते ४०० पोत्यांची तर गव्हाची ७० ते ८० पोत्यांची आवक होत आहे. वाढत्या अवकाळीचा परिणाम दरावर झाला असून उत्पादन अल्प प्रमाणात झाले असले तरी शेतकऱ्यांनी विक्रीची घाई गडबड केल्याने ज्वारीला १६०० रु. क्विंटल तर गव्हाला २५०० रु क्विंटल दर मिळत आहे. आवक घटताच दरात वाढ होणार असून शेतकऱ्यांनी शेतीमाल विकण्याची गडबड करू नये, असा सल्ला जिल्हा गुणनियंत्रक रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.अन बाजार समिती गजबजलीखरीप हंगामातील उत्पादनाची आवक झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून बीड कृषी उत्पन्न बाजार समिती ओसाड पडली हाती. गेल्या पंधरवाड्यापासून रब्बी हंगामातील बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांची आवक वाढल्याने समिती परिसरात दुपारी १२ पर्यंत सौदे होऊ लागले आहेत. चौसाळा, राजुरी, पिंपळनेर, मांजरसुंबा, पाली भागातील शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.