शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: May 11, 2014 00:37 IST

राजकुमार देशमुख, सेनगाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगावात स्मशानभूमीच नसल्याने मृतांवर रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवली आहे.

 राजकुमार देशमुख, सेनगाव अगदी छोट्यातल्या छोट्या गावात, वाडी-तांड्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी आहेत, रस्ते आहेत; परंतु तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगावात स्मशानभूमीच नसल्याने मृतांवर रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवली आहे. अत्यंत लाजीरवाणी बाब असलेला हा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडत पडला आहे. तालुका निर्मितीनंतर सेनगावच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. इतर ठिकाणांवरून ग्रामस्थ सेनगावात वास्तव्यास येत असून गावाचे शहरात रुपांतर होत असताना तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगावात मूलभूत सुविधा मिळणे दुरापास्त झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. येथील सर्व धर्मियासाठी असणार्‍या स्मशानभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत चाळीस वर्षांपूर्वी उभारली होती. तेव्हापासून गावात स्मशानभूमीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून गावात सार्वजनिक स्वरुपाची स्मशानभूमी नसल्याने जुन्या गावातील विविध समाजाचे ग्रामस्थ भरवस्तीत सद्य:स्थितीतील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच प्रेतांवर अंत्यसंस्कार करतात तर नवीन वस्तीतील ग्रामस्थ हिंगोली रस्त्यावरील कयाधू नदीच्या काठावर अंत्यसंस्कार कार्यक्रम उरकतात. या दोन्ही ठिकाणी कोणत्याही स्वरुपाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. शंभर, पन्नास ग्रामस्थांना उभे राहण्यासाठी जागा नाही, पावसाळ्याच्या दिवसांत तर पुसता सोय नाही. अख्ख्या गावात स्मशानभूमीचे एकही शेड नाही. एखाद्या कुटुंबात दु:खद घटना घडली तर त्या कुटुंंबप्रमुखाला अशासमयी अंत्यसंस्कार करण्यासाठी दु:ख बाजूला सारून जागेचा शोध घेण्याची लाजीरवाणी अवस्था झाल्याचे पहावयास मिळते. काही समाजातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर दफनविधीसाठी वापरण्यात येणार्‍या जागेवरही अतिक्रमण झाले आहे. दफनविधीसाठी वापरण्यात येणार्‍या जागेचाही कोणताच विकास झाला नसून या ठिकाणी उकंड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सेनगावात एक प्रकारे प्रशासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता यामुळे मृतांची एक प्रकारे अवहेलनाच होत आहे. स्मशानभूमीची समस्या सोडविण्यासाठी हतबल झालेल्या ग्रामस्थांनी मागणी करणेच सोडून दिले आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार हिंगोली जिल्हा स्वतंत्र होण्याआधी परभणीत समावेश असलेल्या सेनगावात आजही स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांची प्रचंड अडचण होत आहे अगदी लहान गावातही स्मशानभूमी उपलब्ध असताना तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगावात स्मशानभूमीच नसल्याचे चित्र आहे मृतांवर चक्क रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की सेनगावातील विविध समाजाच्या लोकांवर ओढवली आहे; विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून हा प्रश्न कायम आहे स्थानिक लोकप्रतिनिधी, पुढारी या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहत नसल्याने ही समस्या सुटलेली नाही; आता प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे