शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम

By admin | Updated: September 16, 2014 01:31 IST

जालना : जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घनसावंगीतून तुल्यबळ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे तरी कोणाला, असा शिवसेना पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न उभा राहिला आहे.


जालना : जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घनसावंगीतून तुल्यबळ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे तरी कोणाला, असा शिवसेना पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न उभा राहिला आहे.
जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट आहे. विशेषत: जालना, भोकरदन व परतूर या तीन मतदारसंघात मातब्बर असे प्रतिस्पर्धी उमेदवार निश्चित आहेत. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संकेतानंतरच ते कामाला लागले आहेत. या प्रतिस्पर्ध्यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर होणे एवढाच सोपास्कार बाकी आहे. त्यामुळेच जालना, भोकरदन व परतूरमधून सत्तारुढ व विरोधी पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार गेल्या एक दीड महिन्यापासून उमेदवारी पटकावल्याच्या थाटातच मोर्चेबांधणीत दंग आहेत. जालन्यातून विद्यमान आ. कैलास गोरंट्याल, माजीमंत्री अर्जुन खोतकर हे दोघे मातब्बर एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. भोकरदनमधून विद्यमान आमदार चंद्रकांत दानवे हे पुन्हा रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे. तेथून दानवेंविरुध्द दानवेच अशी लढाई होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपूत्र संतोष दानवे हेच रिंगणात उतरतील असे स्पष्ट संकेत आहेत. परतूरमधून आ. सुरेश जेथलिया हे कॉँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. चार दिवसांपूर्वीच ते कॉँग्रेसवासी झाले. उमेदवारी पटकविण्यासह. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर हे तेथून पुन्हा जेथलियांविरोधात रणशिंग फुंकणार हे स्पष्ट आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे लोकसभा निवडणुकीपासूनच घनसावंगीत मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत. परंतू त्यांच्या विरोधात शिवसेना तुल्यबळ उमेदवार म्हणून कोणास रिंगणात उतरवणार असा प्रश्न उभा राहिला आहे. लोकसभा निवडणूकीत तेथून शिवसेनेने मताधिक्य पटकाविल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोबलसुध्दा उंचावले खरे. परंतू शिवसेना पक्षश्रेष्ठी उमेदवाराबाबत द्विधा मनस्थितीत जाणवत आहे.
माजी आ. शिवाजीराव चोथे हे स्वत:स उमेदवारी मिळावू म्हणून प्रयत्नशील आहेत. तर समाजवादी पक्षास सोडचिठ्ठी देवून बाहेर पडलेले माजी आ. विलासराव खरात हे शिवसेनेकडून उमेदवारीसाठी ‘मातोश्री’च्या वाऱ्या करीत आहेत. हे दोघेही एनकेन प्रकारे उमेदवारीसाठी प्रतिष्ठा करीत असल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुध्दा उमेदवारीचा तिढा कायम आहे.
बदनापूरातून शिवसेनेचे विद्यमान आ. संतोष सांबरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून कोणास उमेदवारी मिळेल, हे स्पष्ट नाही. माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी मोर्चेबांधणीत दंग आहेत. तेच प्रतिस्पर्धी म्हणून आघाडीवर आहेत. परंतू राष्ट्रवादीअंतर्गत अन्य इच्छूकांनी त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणीत स्वत:च्या उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या सुरु केल्या आहेत. (प्रतिनिधी)
कॉँग्रेस आघाडीसह महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप पर्यंत न सुटल्याने मित्र पक्षातील इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास संधी मिळू शकेल म्हणून या जिल्ह्यातील दबा धरुन बसलेल्या इच्छूकांच्या आशा-आकांक्षा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
४मुंबई, दिल्लीतील या घडामोडींवर जोपर्यंत पडदा पडणार नाही, तोपर्यंत जागा सोडून घेण्यासह उमेदवारीसाठी किल्ला लढविण्याचा संकल्प या इच्छूकांनी केला आहे.