शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

औरंगाबादच्या अडत बाजाराला नवीन तुरीचे लागले वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 12:18 IST

बाजारगप्पा : मुगाची आवक घटली असून, आता अडत बाजाराला नवीन तुरीचे वेध लागले आहेत

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)

मागील आठवड्यात ज्वारीच्या भावात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढ झाली. अन्य धान्याचे भाव स्थिर होते. मुगाची आवक घटली असून, आता अडत बाजाराला नवीन तुरीचे वेध लागले आहेत. यंदा पावसाने दगा दिल्याने त्याचा मोठा फटका खरीप पिकांना बसला आहे. याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावरही झाला आहे. ज्वारीची पेरणी रबी हंगामात केली जाते. विशेषत: मराठवाडा व विदर्भात ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात होते; पण याच भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली.

विहिरीची पाणी पातळी घटली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यांपासून ज्वारीच्या पेरणीला सुरुवात होत आहे. परिणामी, बाजारात क्विं टलमागे ५० ते १०० रुपयांपर्यंत ज्वारीचे भाव वधारले. जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत जुनी ज्वारी १६०० ते २१०० रुपये प्रतिक्विं टल विक्री होत आहे. मात्र, मोंढ्यात २२५० ते २६०० रुपयांपर्यंत ज्वारी विक्री सुरू आहे. ज्वारीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

राजस्थान, गुजरात आदी राज्यांतून मागील आठवड्यात १२५ टन तर स्थानिक भागातून २० ते २५ टन बाजरी विक्रीसाठी बाजारात आली. अजून आॅक्टोबर हीट सुरू आहे. थंडी पडली नसल्याने बाजरीला मागणी कमीच आहे. परिणामी, १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलवर भाव स्थिर होते. स्थानिक शेतकऱ्यांनी शनिवारी अडत बाजारात बाजरी विक्रीसाठी आणली होती. १२५० ते १८७१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मागील आठवड्यात मध्यप्रदेशसह गुजरात व राजस्थान येथून ३५० टन गव्हाची आवक झाली. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने गव्हाला मागणी आहे; पण मागील आठवड्यात भाव स्थिर होते. २३५० ते २६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गहू विक्री झाला. 

आता नवीन तुरीचे वेध लागले आहेत. येत्या महिनाभरात नवीन तूर अडत बाजारात दाखल होईल. यंदा पाऊस कमी पडल्याने त्याचा तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला होऊन ३० ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सध्या बाजारात जुनी तूर दाळ ५१०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान विक्री होत आहे. नवीन तुरीची आवक सुरू झाली तरीही उत्पादनाला बसलेला फटका लक्षात घेता, भाव कमी होणार नाही, अशी माहिती व्यापारी नीलेश सोमाणी यांनी दिली.

महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन दिल्लीतून नवीन बनावट बासमतीची आवक सुरू झाली होती. ३२०० ते ८ हजार प्रतिक्विंटलपर्यंत डुप्लिकेट बासमतीची विक्री झाली. मात्र, मागील आठवड्यात नवीन तांदळाची आवक कमी प्रमाणात राहिली. नवीन तांदळाच्या अन्य व्हरायटीची आवक दिवाळीनंतर सुरू होईल. उत्पादनाचा अंदाज आल्यानंतरच पुढील तेजी मंदी ठरेल. दरम्यान, शासनाने हमी भाव जाहीर केला. हमी भावाप्रमाणेच व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी करावी, असे आदेश शासनाने दिले असले तरीही तसे कोणीही करीत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी