शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची अजब तऱ्हा....

By admin | Updated: August 24, 2014 02:14 IST

परभणी : दीड ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले

परभणी : दीड ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. परंतु हा पाऊस खंड स्वरुपाचा होता. परभणी तालुक्यात १४ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी केवळ शहर आणि परिसरातच हा पाऊस झाला आणि अनेक खेड्यांमध्ये शुक्रवारी पाऊसच झाला नाही. पावसामसाच्या या अजब तऱ्हेमुळे पिकांचा धोका मात्र अजूनही कायमच आहे.शुक्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास परभणी शहरासह परिसरात एक तास जोरदार पाऊस झाला. परंतु हा पाऊस परिसरातील मांगणगाव, सनपुरी, हिंगला, खादगाव, साटला, समसापूर, धारणगाव, मटकऱ्हाळा, दुर्डी, मुरुंबा या भागात झाला नाही. या भागातील पिकांची परिस्थिती अतीशय नाजूक आहे. दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या भागात मुख्यत्वे सोयाबीन, कापूस आणि मूग ही पिके शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली आहेत. सोयाबीनची वाढ खुंटली आहे तर मूग सुकत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिक परिस्थिती गंभीर आहे. पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळी खोल जात आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस झाला नाही तर पिके मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शुक्रवारी पावसाच्या आगमनामुळे आशादायक चित्र निर्माण झाले असले तरी तालुक्यातील काही गावांमध्ये मात्र हा पाऊस झालाच नाही. त्यामुळे या भागातील पिकांची परिस्थिती अजूनही नाजूकच आहे. (प्रतिनिधी)