शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त महिलांची ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:28 IST

वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीतील पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासाठी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठुन सरपंच व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पाणी पुरवठा करण्यात आला.

गावातील अजवानगर, दत्त कॉलनी, शिवाजीनगर आदी भागात मार्चपासून नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीकडून आठवडाभराच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात होता.

मात्र, आजघडीला या नवीन वसाहतीतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहेत. गावाला पाणी पुरवठा करणारी एक सार्वजनिक विहीर कोरडी पडली असून, रामराईरोडवरील विहिरीच्या पाणी पातळीतही घट झाली आहे.

गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने गरवारे उद्योग समुहाकडून गावात दररोज जवळपास ५० हजार लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

अजवानगरातील महिला व नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंचासह पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी अनिता धिर, अमिना खान, योगिता चव्हाण, लंका मालोदे, करिमा बेगम, छाया देशमुख आदींनी सरपंच पपीन माने व पदाधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करुन सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. या प्रसंगी सरपंच माने यांनी एमआयडीसीने पाणी पुरवठ्यात कपात केल्याने तसेच विहिरीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर या परिसरात तात्काळ पाणी पुरवठा सुरु करुन संबंधित दोन कर्मचाºयांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्याचे सरपंच माने यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात