शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

७५ टक्के सौरकंदिल, शिलाई मशीन अणदुरात !

By admin | Updated: April 23, 2015 00:46 IST

बाबूराव चव्हाण ,उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सर्व मतदार संघामध्ये समान निधी वाटप करण्याच्या गप्पा सभागृहामध्ये मारल्या जातात. परंतु, दुसरीकडे अधिकारी मंडळी मात्र

बाबूराव चव्हाण ,उस्मानाबादजिल्हा परिषदेच्या सर्व मतदार संघामध्ये समान निधी वाटप करण्याच्या गप्पा सभागृहामध्ये मारल्या जातात. परंतु, दुसरीकडे अधिकारी मंडळी मात्र, तालुक्यासाठी आलेल्या उद्दिष्टापैकी ७५ टक्के उपकरणे ही एकट्या अणदूर गावामध्ये मंजूर केली आहेत. ही धक्कादायक बाब नुकतीच उजेडात आली आहे. त्यामुळे जनतेचे कैवारी म्हणून घेणाऱ्यांचा सरकारी बाबुंवर वचक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन, पिको-फॉल मशिन तसेच सौरकंदिल वाटप करण्यात येतात. त्यानुसार प्रशासनाने अर्ज मागविले होते. याला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिलाई मशिनसाठी शंभर, दोनशे नव्हे, तर तब्बल ५५९ अर्ज दाखल झाले होते. असेच चित्र पिको-फॉल मशिनच्या बाबतीत आहे. तब्बल साडेचारशेवर अर्ज दाखल झाले होते. तर दुसरीकडे सौरकंदिलसाठी १०३ अर्ज आले होते. अर्जांच्या छाननीनंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून मतदारसंघ निहाय अथवा प्रकल्पनिहाय समान वाटप करणे अपेक्षित होते. परंतु, घडले याच्या उलट. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी उपकरणे मंजूर केली आहेत. तुळजापूर प्रकल्पांतर्गतच्या लाभार्थ्यासाठी ३४ शिलाई मशिन, ४१ फिको-फॉल मशिन तर २७ सौरकंदिल मंजूर करण्यात आले होते. याचे लाभार्थी निश्चित करताना समतोल राखणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. ३४ पैकी २३ शिलाई मशीनासाठी एकट्या अणदुरातील लाभार्थी निश्चित केले. तसेच पिको-फॉल मशिनच्या बाबतीतही हेच घडले. ४१ पैकी तब्बल ३० मशीन अणुदरातील लाभार्थ्यांना मंजूर केल्या आहेत. तर २७ पैकी २२ सौरकंदिल अणदूर येथील भार्थ्यांना देण्यात येणार आहेत. दरम्यान, लाभार्थ्यांची ही सर्व यादी महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत ठेवली जाते. असे असतानाही हा प्रकार समितीवरील अन्य सदस्यांचा लक्षात आला नसावा का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, याबाबतीत राष्ट्रवादीचे सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी आक्षेप घेतला आहे. हा प्रकार त्यांनी सीईओ सुमन रावत यांच्याकडे मांडून याच्या चौकशीची मागणीही केली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबतीत काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे. जिल्ह्यासाठी ५ लाख ४८ हजार ८७ रूपयांतून १५७ शिलाई मशिन, १० लाख ९९ हजार ४०० रूपयांतून २०० पिको-फॉल मशिन तर ५ लाख ५९ हजार ८४० रूपयांतून २३२ सौरकंदिल खरेदी करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या तिजोरीतून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २२ लाखांच्या आसपास रक्कम यावर खर्च होत आहे. असे असतानाही लाभार्थी निवडताना समतोल राखण्याकडे का दुर्लक्ष झाले? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.तुळजापूर प्रकल्पांतर्गत गावांची संख्या काही कमी नाही. असे असतानाही महिला व बालकल्याण विभागाने अख्ख्या प्रकल्पासाठी मंजूर असलेल्या १०२ उपकरणांपैकी तब्बल ७५ उपकरणे ही एकट्या अणदूर येथील लाभार्थ्यांना मंजूर केली आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाची एकट्या अणदूरवरच एवढी मेहरबानी का? असा सवाल सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी केला आहे.अनेकांना दुहेरी लाभ ?४सेस फंडातून राबविण्यात येत असलेल्या या योजनांतर्गत कोणत्याही लाभार्थ्यांना दुहेरी लाभ दिला जावू नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे महिला व बालकल्याण विभागाने कानाडोळा केल्याचे समोर आले आहे. एकट्या तुळजापूर प्रकल्पांतर्गतच्या दहा ते बारा जणांना दुहेरी लाभ दिला आहे. तर काही लाभार्थी एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे याही प्रकरणाची चौकशी होणे अपेक्षित आहे.जिल्हा परिषदेकडून आकारण्यात येणाऱ्या विविध करांच्या माध्यमातून सेस फंडामध्ये जमा होणाऱ्या रक्कमेतून ही योजना राबविली जात आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ देताना तितकाच समतोल राखणे अपेक्षित आहे. परंतु, तसे झालेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष घालावे अशी मागणी होवू लागली आहे.