शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

चार महिन्यांत ६ लाख ७७ हजार नागरिक औरंगाबादमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 1:06 PM

महाराष्ट्र शासनाने जिल्हाबंदी अद्याप उठविलेली नाही. असे असतानाही शहरात वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही.

ठळक मुद्देशहरात दररोज ५ हजार ग्रामीणमधून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण बरेच

औरंगाबाद : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरात बाहेरील नागरिक येण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. मागील चार महिन्यांत ६ लाख ७७ हजार नागरिक शहरात दाखल झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासनाने जिल्हाबंदी अद्याप उठविलेली नाही. असे असतानाही शहरात वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर मोठ्या शहरांमधून नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. असंख्य नागरिक पोलिसांची परवानगी घेऊन येत आहेत तर काही जण विनापरवाना येत आहेत. हर्सूल, जालना रोड, मुंबई रोड येथे मागील चार महिन्यांपासून २४ तास शहरात येणाऱ्या नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात येत आहे. दररोज पाच हजारांहून जास्त नागरिक शहरात दाखल होत आहेत. शहराच्या आसपासच्या  गावांमधील नागरिक साहित्य खरेदीसाठी शहराच्या बाजारपेठेत येतात. त्यामुळे संख्या वाढल्याचे मनापाने सांगितले.

नागरिकांनी नियमांचे पालन करावेलॉकडाऊनला शंभर दिवस पूर्ण होत आले. मागील चार महिन्यांपासून कोरोना योद्धे आणि नागरिकांच्या मदतीने काम सुरू आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे. या सर्व परिस्थितीवर महापालिका नजर ठेवून आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचा अवलंब करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत, घराबाहेर कमीत कमी पडावे.-आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका प्रशासक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद