शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

५७ ग्रा.पं.ना ‘रेडकार्ड’!

By admin | Updated: June 30, 2014 00:37 IST

संजय तिपाले , बीड जिल्ह्यातील तब्बल ३१४ गावांमधील ग्रामस्थांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागते़ त्यापैकी ५७ ग्रामपंचायती तीव्र जोखमीच्या असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे़

संजय तिपाले , बीडजिल्ह्यातील तब्बल ३१४ गावांमधील ग्रामस्थांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागते़ त्यापैकी ५७ ग्रामपंचायती तीव्र जोखमीच्या असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या ग्रामपंचायतींना ‘रेडकार्ड’ बजावले आहे़जून महिना संपला तरी अद्याप पुरेसा पाऊस नाही़ त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करत आहे़ दुसरीकडे उपलब्ध पाण्याचे काही स्त्रोत दूषित आहेत़ त्यामुळे नाईलाजाने सामान्यांवर दूषित पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ आली आहे़ मे महिन्यात आरोग्य विभागाने ग्रामीण भागात ११३ ठिकाणी पाणी नमुने घेतले़ त्यापैकी ३१४ नमूने दूषित असल्याचे आढळून आले़ त्याचे प्रमाण २८ टक्के इतके आहे़ पाणी नमूने दूषित आढळलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ काय आहेत कार्ड?एखाद्या गावातील ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लोक दूषित पाणी पित असतील तर अशा ग्रामपंचायतींना तीव्रजोखमीचे गाव समजले जाते़ त्यांना रेडकार्ड दिले जाते़ जिल्ह्यात ५७ ग्रा़पं़ ना रेडकार्ड दिले आहे़ ३१ ते ६० टक्के नागरिक दूषित पाणी पित असतील तर मध्यम जोखमीचे गाव मानले जाते़ अशा ग्रा़पं़ ना पिवळे कार्ड दिले जाते़ ० ते ३० टक्के लोक दूषित पाण्यावर तहान भागवत असतील तर अशी गावे सौम्य जोखीम या गटात मोडतात़ त्यांना हिरवे कार्ड दिले जाते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांनी दिली़ या कार्डवर उपाययोजनांची माहिती असते़वैयक्तिक काळजी महत्त्वाचीजिल्हा प्रजनन व बालस्वास्थ्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे म्हणाले, पाणी दूषित असले तरी ते शुद्ध करुन पिण्यासाठी वैयक्तिक उपाययोजना कराव्यात़ गढूळ पाण्यात तुरटी फिरवावी़ १० लिटर पाण्यात पाच थेंब लिक्विड क्लोरिन टाकावे़ गरोदर माता, वृद्ध व एक वर्षांपर्यंतच्या बाळांना पाणी उकळून व गाळूनच द्यावे असा सल्लाही त्यांनी दिला़जलसुरक्षकांना सूचनाग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहेत़ जल सुरक्षकांना याबाबत सूचना दिल्या असून पाणीनमुने नियमित तपासण्यास सांगितले आहे़ ग्रामपंचायतींनीही योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया भारत निर्मल अभियानचे जिल कार्यक्रम व्यवस्थापक एस़ बी़ वाघमारे यांनी दिली़कार्यशाळांतून उपाययोजनापाणी गुणवत्तेच्या संदर्भाने नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा घेतली़ त्यानंतर आता १ जुलैपासून तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात येतील़ ५७ ग्रा़पं़ ना लालकार्ड दिले आहेत़ त्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेतला जाईल, असे पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले़ग्रा.पं.ने करावयाच्या उपाययोजना...!दूषित पाणी असलेल्या ग्रामपंचायतींनी शुद्धीकरणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ़ पी़ के़ पिंगळे यांनी दिल्या़ पाणी वाहते करावे, विंधनविहिरींमध्ये ब्लिचींग पावडर टाकावे, दुरुस्ती कामे करावीत, स्त्रोतांच्या ५० फूट अंतरापर्यंतचा परिसर स्वच्छ ठेवावा, तेथे पाणी साचू देऊ नये अशी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले़दूषित पाण्याने होणारे आजारदूषित पाणी शरीराला घातक आहे़ गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ यासारखे जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते़ यात एखाद्या रुग्णाचा मृत्यू होण्याचीही भीती असते़तालुका निहाय असे बजावले कार्डतालुकालाल कार्डपिवळे कार्ड हिरवे कार्डअंबाजोगाई१४५५ ३१आष्टी ००१९ १०३बीड०९५३ १११धारुर०० १९ ३६गेवराई१२९३ २७केज००२३ ९०माजलगाव१४५३ २३परळी००३९ ५२पाटोदा ०७१९ ३४शिरुर०१३९ १२वडवणी०० १३ २३एकूण ५७४२५ ५४२