शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

४आॅगेस्टअखेर पुरेल एवढे पाणी

By admin | Updated: November 23, 2014 00:23 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा राहील. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा राहील. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. आॅगस्टअखेरपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा नगर पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता शहर पाणीपुरवठ्याबाबत मनोहरे यांनी विचार असता त्यांनी टंचाई नसल्याचे सांगितले.
गत दोन वर्षांपूर्वी जालनेकरांनी अभूतपूर्व अशा पाणीटंचाईचा सामना केला. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. हजारो रुपये पाण्यात घातले. एवढे करुनही शहरवासियांची तृष्णा भागू शकली नाही. याच पार्श्वभूमीवर मनोहरे म्हणाले की, शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या घाणेवाडी जलाशयात यात १२ फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. यामुळे नवीन जालनावासियांना व्यवस्थित पाणी मिळत आहे. जुना जालना भागासाठी जायकवाडी- जालना योजनेतून पाणी मिळते. या भागातील दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. काही भागात अंतर्गत जलवाहिनी नादुरुस्त असल्यामुळे पाणी मिळत नाही. मात्र, नगर पालिकेकडून बहुतांश भागात पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, मुख्याधिकरी म्हणत असले तरी नवीन व जुना जालना भागातील अनेक ठिकाणी नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यास पालिकेचा कारभार जबादार असल्याची चर्चा आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी वाटपाचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी होत असून पालिकेचे त्याकडे मात्र दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)
गत वर्षीच्या तुलनेत यंदा शहर परिसरात पाणीटंचाई भासणार नाही. यासाठी नगर पालिकेकडून नियोजन करण्यात येत असल्याचे मनोहरे म्हणाले. जलवाहिनी दुरुस्तीचे कामे हाती घेण्यासोबतच गरज पडल्यास टँकरद्वारे पाणीपुरठा करण्यात येईल. ज्या भागात जलवाहिन्या नाहीत तेथेही पालिकेकडून सर्वेक्षण करुन पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे.
४दरम्यान, पालिकेकडून नियोजनाचा डंगोरा पिटला जात असला तरी पालिकेचे नियोजन ऐनवेळी कोलमडत असल्याचे सर्वश्रुत आहे. पालिकेकडून उडवाउडवाची तसेच थातूरमातूर नियोजन करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असाही आरोप होतो. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पालिका पाण्याचे काय नियोजन करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मनोहरे म्हणाले, ज्या भागात जलवाहिन्या नाहीत अथवा पाणीटंचाई भासू शकते तेथे कूपनलिका घेण्याचा प्रस्ताव आहे. अंतर्गत जलवाहिनी दुरुस्तीचेही कामे करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमित कर भरण्याचे आवाहन केले. जेणे करुन मूलभूत सुविधा पुरविण्यास मोठी मदत होईल.