शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

३०५५ उद्योगांचे प्रस्ताव रखडले

By admin | Updated: August 14, 2014 01:57 IST

बाळासाहेब जाधव , लातूर जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील गरजुंना रोजगार मिळावा म्हणून उद्योग केंद्र कार्यरत आहे़ त्यानुसार या केंद्राकडे ३ हजार ४१८ जणांनी




बाळासाहेब जाधव , लातूर
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील गरजुंना रोजगार मिळावा म्हणून उद्योग केंद्र कार्यरत आहे़ त्यानुसार या केंद्राकडे ३ हजार ४१८ जणांनी लघु उद्योगाची नोंदणी केली़ परंतु, या उद्योजकांनी आपला प्रकल्प अहवाल दिलेल्या कालावधीत बँकेकडे सादर केला नसल्यामुळे ३०५५ सर्व लघुउद्योगाचे प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता आहे़
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने २०१२-१३ मध्ये अस्थाई उद्योगामध्ये सुक्ष्म उद्योग - २३२५, लघु उद्योग - ३२८, मध्यम - ३ तर स्थाई उद्योगामध्ये सुक्ष्म उद्योग - ६०, लघु - १७, अशा एकूण २६५६ उद्योगाचे प्रस्ताव दाखल झाले होते़ यापैकी ७७ उद्योग सुरू होवून स्थाई उद्योगामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला़ २०१३-१४ मध्ये अस्थाई उद्योगामध्ये सुक्ष्म उद्योग ६५८, लघुउद्योग -१०६, मध्यम-१ तर स्थाई उद्योगामध्ये सुक्ष्म- २५७, लघु उद्योग-२८ व मध्यम-१ यामध्ये एकूण ७६५ उद्योगांपैकी २८६ उद्योग स्थाई स्वरूपात आले आहेत़ यामध्ये एकूण ३ हजार ४१८ उद्योगांच्या प्रस्तावांपैकी दोन वर्षांच्या कालावधीत ३६३ प्रस्तावांना स्थाई स्वरूप आले आह़े तर उर्वरित उद्योगांचे प्रस्ताव मात्र जिल्हा उद्योग केंद्राने आमन्य केले आहेत़ दोन वर्षांच्या कालावधीत बँकेला प्रकल्प अहवाल आणि अन्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते़ परंतू या उद्योजकांनी प्रकल्प अहवाल सादर केला नाही़ त्यामुळे त्यांचे प्रस्ताव रद्द होण्याच्या मार्गावर आहेत़ परिणामी, उद्योग क्षेत्राला घरघर लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़


केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू व सुशिक्षीत बेरोजगारांना जिल्ह उद्योग केंद्राच्या माध्यमातून लघू उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे़ उद्योजक बनणाऱ्या व्यक्तीला प्रस्ताव व प्रकल्प अहवाल बँकेला सादर करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी दिला जातो़परंतू दिलेल्या कालावधीत कागदपत्राची पूर्तता न केल्यास लघुउद्योगासाठी दाखल करण्यात आलेले प्रस्ताव लॅप्स केले जात असल्याची माहिती जिल्ह उद्योग केंद्राचे जिल्ह महाव्यवस्थापक बी़त्री़यशवंते यांनी दिली़