शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

३० टक्के मतांवरही ‘लॉटरी’!

By admin | Updated: September 28, 2014 00:20 IST

जय तिपाले , बीड युती, आघाडीच्या प्रमुख उमेदवारांतील लढसंतींमुळे गतवेळी विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांना ४५ टक्क्यांहून अधिक मते घ्यावी लागली होती़ आता बहुरंगी लढती होत आहेत़

जय तिपाले , बीडयुती, आघाडीच्या प्रमुख उमेदवारांतील लढसंतींमुळे गतवेळी विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांना ४५ टक्क्यांहून अधिक मते घ्यावी लागली होती़ आता बहुरंगी लढती होत आहेत़ शह- काटशहाच्या राजकारणामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता असून ३० टक्के मते मिळविणाऱ्या उमेदवारालाही आमदारकीची ‘लॉटरी’ लागू शकते़ जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत़ आतापर्यंत कुठल्याही दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत ‘स्ट्रेट फाईट’ झालेल्या आहेत़ फार तर तिरंगी लढती होत असत़ आता स्थिती याऊलट आहे़ युती, आघाडीतील फाटाफुटीने सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी दंड थोपटून आखाड्यात उडी घेतली आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे हे प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जात आहेत़ त्यामुळे आता प्रत्येकाला आपले अस्तित्व दाखवावे लागणार आहे़ याशिवाय डावी आघाडी, अपक्ष व इतर पक्षांचे उमेदवारही नशीब आजमावत आहेत़ सर्वांनीच वेगळ्या चुली मांडल्याने मतदारांना उमेदवार निवडण्यासाठी मोठा वाव आहे़ दरम्यान, गतवेळी जिल्ह्यात एकूण मतांच्या ४५ टक्क्यांहून अधिक मते घेणारे उमेदवार जिंकले होते़ यावेळी मतांचे विभाजन अटळ असल्याने ३० टक्के मते घेणारा उमेदवारही विजय मिळवू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे़कोण किती पाण्यात ?स्वतंत्र लढतीत कोण कोणाची मते खेचतो? यावर देखील बऱ्याचअंशी भवितव्य अवलंबून राहणार आहे़ मतदान करताना उमेदवार, पक्ष, जात या साऱ्या बाबी गृहित धरल्या जातात़ प्रत्येकाला एकाचवेळी चार ते पाच प्रभावी पहेलवानांशी झुंजायचे आहे़ त्यामुळे सर्वांचीच कसोटी लागणार आहे़ अशा स्थितीत कोण किती पाण्यात आहे? अन् कोण कोणाला भारी ठरतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे़