शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कांदाचाळीसाठी अखेर तीन कोटीचा निधी !

By admin | Updated: August 5, 2016 00:13 IST

कळंब : तालुक्यातील पाचशेच्या आसपास कांदा चाळ उभा करणारे शेतकरी कृषी विभागाकडून अनुदान मिळावे म्हणून हेलपाटे मारत होते.

कळंब : तालुक्यातील पाचशेच्या आसपास कांदा चाळ उभा करणारे शेतकरी कृषी विभागाकडून अनुदान मिळावे म्हणून हेलपाटे मारत होते. दुष्काळी झळा सोसून कासावीस झालेल्या या शेतकरी जिल्हा कृषी कार्यालयाकडे यासाठी निधीच नसल्याने हैराण झाले होते. कांदा चाळ उभारून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची ही शोकांतिका ैै‘लोकमत’ने ठळकपणे प्रसिद्ध करून ऐरणीवर आणली होती. अखेर कृषी विभागाला जाग आली असून मंगळवारी जिल्हा कृषी कार्यालयास यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.अलीकडील काळात उस्मानाबाद जिल्ह्यात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. यामुळेच कळंब तालुक्यासह विविध भागात कांदा लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. परंतु मुळात नाशवंत पदार्थ असलेल्या कांदा उत्पादनाबाबतीत बाजारपेठेची उपलब्धतता, साठवणुकीची सोय नसणे, अस्थिर दर याचा मोठा फटका बसतो. विकावा तरी तोटा व ठेवावा तरी तोटा अशी वारंवार स्थिती निर्माण होत असल्याने काढणीपश्चात साठवणुकीची सोय निर्माण गरजेचे झाले होते. यानुसार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्हा कृषी कार्यालयाने काढणीपश्चात व्यवस्थापन व पणन सुविधा उभारण्यासाठी ५० टक्के अनुदानावर कांदा चाळ उभारणी प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती.कळंब तालुक्यात जवळपास ९०० च्या आसपास कांदा चाळींना यानुसार मंजुरी देण्यात आली होती. यातील ५०० च्या आसपास देयके कृषी विभागाला सादर करण्यात आली होती. परंतु उद्दिष्टापेक्षा जास्त मंजुरी दिल्याने प्राप्त निधी अपुरा पडू लागला होता. यामुळे तालुक्यातील केवळ ३० ते ३५ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले होते. ऐन दुष्काळात कांदा चाळ उभी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पै पै गोळा करून मोठा खर्च केला होता. परंतु जिल्हा कृषी कार्यालयाकडे निधी उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. या संदर्भात लोकमतने वारंवार सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या हा प्रश्न निदर्शनास आणून दिला होता. (वार्ताहर)