शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा १८४ गावांना फटका

By admin | Updated: April 14, 2015 00:31 IST

बीड : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. ९ ते १२ एप्रिल या कालावधीत झालेला अवेळी पाऊस व गारपीट यांच्यामुळे जिल्ह्यातील

बीड : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. ९ ते १२ एप्रिल या कालावधीत झालेला अवेळी पाऊस व गारपीट यांच्यामुळे जिल्ह्यातील १८४ गावांतील १ हजार ७६५ हेक्टरवरील फळबागा, शेतीपिके व भाजीपाला यांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.बीड तालुक्यातील ६ गावे, आष्टी - ६, गेवराई - १७, धारूर - २२, वडवणी - १२, अंबाजोगाई - १६, केज - ८३ व परळी - २२ या गावांमध्ये अवकाळी गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्याच्या सुरूवातीला गारपीट झाली होती. तेव्हा जवळपास ६० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाही अवकाळी पाऊस झाल्यामुळे १ हजार ७६५ हेक्टरवरील फळपिके, शेतीपिके व भाजीपाला बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे.विशेष म्हणजे बाधित क्षेत्रामध्ये फळबागांचे नुकसान अधिक झाले असल्याचे समोर आले आहे. १ हजार १६९ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यात परळी व केज तालुक्यातील गावांमधील फळबागांचा समावेश आहे. शेतीपिकांचे अत्यल्प नुकसान झाले आहे तर भाजीपाल्याला मोठा फटका बसला आहे. ५७६ हेक्टरवरील भाजीपाला बाधित झाला आहे. केज व धारूर तालुक्यातील क्षेत्र अधिक आहे. केजमधील १९३ तर धारूर १८५ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित क्षेत्रापैकी ५० टक्क्यापेक्षा कमी असणारे क्षेत्र ५६ च्या आत तर ५० पेक्षा जास्त बाधित क्षेत्र १ हजार ७०९ हेक्टर असल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. (प्रतिनिधी)